Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, २९ एप्रिल, २००९

संग कसा जगायचं

Share



पडायचा असता प्रेमात कधी कधी

Share

थोड्या फोटो कविता

Share




चला थोड़े हसुया

Share

Mazhi ann tuzhi

Share

Mazhi ann tuzhi
same caste
Tu dombivali fast
mi UK blast


mi diamond king,
tu beauty queen
mi anamika
tu golden ring


tu director
mi action
tu designer
mi fashion



mi ful
tu ful pakali
mi swapnn
tu swapn-kali


tu mumbaikar,
mi punekar
tu sasar
mi maher ghar


mi monthly salary,
tu blank cheque
tu kokanchi lek,
mi ganesha cha Namesake

दाटले हृदयात माझ्या

Share

दाटले हृदयात माझ्या......``

दाटले हृदयात माझ्या ते तुझ्या कानी पडावे
केस सावरणे तुझे, शृंगारणे पुन्हा घडावे

देव तू बनवून मजला प्रीतिने केलीस पूजा
प्रेम माझे सांगते मज, देवपण तुजला जडावे

थांग अपुला लागता कामा नये त्या शोधत्यांना
आड दडतो मी तुझ्या अन् आड तू माझ्या दडावे

येउनी बाहूत माझ्या वेदना तव शांत व्हावी
कुंतली लपता तुझ्या मी दुःखही माझे उडावे

आपण परत तिथेच भेटायचं

Share

आपण परत तिथेच भेटायचं .....``

शेवटचा निरोप घेऊ नकोस,

फक्त "परत भेटू" म्हण..

कारण सखे..

आपण परत तिथेच भेटायचं ..



रोजंदारी शिकवत रहाते,

जगण्याचे नवे बहाणे..

अनेक शिड्या , अन अनेक घोडे,

वर नेऊ पहाणारे...

जीव तोडून आता एकदा

आभाळाला भिडायचं

कारण सखे..

आपण परत तिथेच भेटायचं..



मी धूळ .. तू ही धूळ

शेवट नशीबी असते माती ..

का उगाचच मोडावी

तुझी नि माझी अक्षय मैत्री...

कधीतरी सोडून सारे ..

पूर्ण नभ व्यापायचं..

आपण परत.... तिथेच भेटायचं...

तुझ्या असण्यामुळं

Share

तुझ्या असण्यामुळं
जगणं थोडं सुसह्य झालंय
तुझ्यामुळं मला हक्काचं
विसाव्याचं स्थान मिळालंय...

माहित आहे मला...

वादळ थोपवायला
तूही असमर्थ आहेस नि मी ही
पण वादळं झेलण्याचं नि पेलण्याचं
तुझ्यामुळंच मला सामर्थ्य मिळालंय...

माहित आहे मला...

या भरकटलेल्या गलबताला
तू दिशा नाही दाखवू शकत
पण नांगर टाकून स्थिर होण्यासाठी
तुझ्यारुपी एक बेट मिळालंय...

माहित आहे मला...

घाव घालणारे घाव घालतच जाणार
तुकडे तुकडे होतच राहणार
घातलेले टाके उसवतच राहणार
धबधब्यासारखं जन्मभर कोसळतच राहणार...

पण यातून सावरण्यासाठी
मला तुझं दान मिळालंय
तुझ्या असण्यामुळं
जगणं थोडं सुसह्य झालंय...

तु.

Share

वार्यावर उडणारी बटं सावरताना
खुप छान दिसायचीस तु,
तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन
खुप छान हसायचीस तु.
नेहमीच मला माझ्या अवतीभोवती
खरचं भासायची तु,
मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग
आल्यावर,कुठेच नसायची तु..
माझ्यावरच हसुन झाल्यावर" माझे"
पुन्हा मला दिसायची तु,
मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत
जेव्हा खरी-खुरी असायची तु...

एक सरिता रागवली आपल्या boyfriend ला म्हणाली.

Share

एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली

'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?

दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी

मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.

सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने

लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!'

काय म्हणू मी?

Share

काय म्हणू मी?``
या ओढीला काय म्हणू मी?
प्रीतीची सुरवात म्हणू?
हृदय सागरावर उठलेला
भीषण झंझावात म्हणू?

या वेडाला काय म्हणू मी?
आशेचे नवगान म्हणू?
की मृगजळ ते पाहूनिया
मृग हरवले भान म्हणू?

हे आवडणे हे आठवणे
प्रेमाचा मधूमास म्हणू?
की एकटेपण संपवण्याचा
एक अट्टाहास म्हणू?

या प्रेमाला.... काय म्हणू मी??

तुझी आठवण येताना

Share

तुझी आठवण येताना

गंध तुझा घेउन येते,

हरवलेल्या स्वप्नांना

रंग तुझा देउन जाते..

तुझ्या पैजणांची रुणझुण

कानांमध्ये दाटुन येते,

मी मिटुन घेतो डोळे तेव्हा

तु मिठीत हळुवार भेटुन जाते...

स्वप्नांतले जगणे माझे

वास्तवाचे भान सुटुन जाते,

मनात तुझ्या आठवांचे

पुन्हा रान पेटुन येते....

तुझी आठवण येताना

गंध तुझा घेउन येते..,

हरवलेल्या स्वप्नांना

रंग तुझा... देउन जाते.....

mithi:-

Share

Jahaj budat hott
jya kushit bagadll
tyatach aaj lupt hot hott

pani dhund zhall hott
tyalach mahit navhatt
ki tyachi mithi
kunacha tari pran ghet hoti

jahaj budat hott
tari maran-mithi tun sutnyacha
kasoshine praytn karat hott
ann punha panya varati
swar honyacha veda praytn karat hott

mag aankhinach aaveshane
pani tyala kushit ghet hott
sagale bandh sampvoon
aaplya kushit samavoo pahat hott

pan na tyala
na panyala mahit hott
tyanach prem
tya nirmatyala hi manjoor navhatt

Modular -- ek compony:-

Share

aathvate ka tumhala
aapalle roz office la yenn
kam kami ann
ekmekantach jast rangun jann

jevna-nantar dupari
ekmekan barobar firann
kahihi vishay kadhun
barach vel ghalavann

sandhyakali get var, zhadakhali
roz bus chi vat pahann
boltana mag matra
24 asso ki 42
eka-pathopath ek bus sodun denn

aata saarr badalay
junn office sodun saglyani
naveen office join kelay

tech get tech zhad
aata shant zhalay
punha aapan tithe bhetnyachi matrr
aas laoon baslay

Takraar nahi, tarihi..............:-

Share

Sobat chalta chalta achanak
Tu vegali vat dharlis,
Kali manachi umalatanach
Nirmalyat tu taklis.
Takrar nahi karat mi,
Pan manat…….
Bhavnanch wadal sathat
Aapsukach mag prem manatal
Dolyanmadhe datat.
Baki …………………..
Swapnanch sangaych jhal
Tar…..
Tyanch aayushya hi chot
Aani…………
Astistva hi khot.
Tutaychach hot tyana,
Mhanun ti tutali.
Majhi aani sukhachi matra
Shewatchi gaath hi sutali.
Tu as ka kelas he matr
vicharnar nahi mi tula
karan majhyasamor tu
man jhukavan
pahavnaar nahi mala.....

mazhi tu tyachi hotana -3:-

Share

Pahile aahe mi aaj
mazhi tu tyachi hotana
aasu mazhe oghalale
haluch mage valun pahatana

pahile aahe mi aaj
mazhi tu tyachi hotana
mazhya dolyatil aasu
aani tuzhya othanvaril hasu
yanche sadharmya jantana

pahile aahe mi aaj
mazhi tu tyachi hotana
aandharle mazhe jag
bhutkalat valun pahatana

pahile aahe mi aaj
mazhi tu tyachi hotana
aanbhavale ann mi
vasantat hi panghali hotana

mazhi tu tyachi hotana -2:-

Share

saang na sakhe tuch aata
mazhya pasun door jatana
kay vatate tula aaj
mazhi tu tyachi hotana


Muktt karuni ya bhandana
joduni nava anu-bhand ha
kay vatate tula aaj
mazhi tu tyachi hotana ?

ekach vateche pakshi aapan
pan mi ya dishela aan
tu viruddha dishela jatana
kay vatate tula aaj
mazhi tu tyachi hotana

saang na sakhe tuch aata
mazhya pasun door jatana
aardhang eethech sodun
kay vatate tula aaj
tyachi aardhangi hotana ?

mazhi tu tyachi hotana -1:-

Share

Kase pahin saang tuch aata
mazhi tu tyachi hotana ?
mag asahhya hotil ya jivghenya yatna

saang na sakhe tuch aata
kase pahanar mi
mazhi tu tyachi hotana ?

mala mahit aahe mi ,
aan mala mahit aahe tu , pan
pan..
mala mahit nahi tuzhyashivay mi
aani mazhyashivay tu ,

tenvha kase pahin saang tuch aata
mazhi tu tyachi hotana ?
aani kay avastha hoyeen mazhi
tuzhya tya aathvani japtana …

ती सकाळ

Share

ती सकाळ .. .
रोजच्या सारखी नव्हती ,
तुझ्या आठ्वंनिच्या स्वप्नातून ,
बाहेर आलेली होती ,

ती सकाळ...
भरभरून आनंद देणारी होति,
मंद मोगरा फुलताना ,
पहन्यासर्खी होति,

ती सकाळ...
वार्यकाहा गंध मस्त पसरला होता,
तुझ्या आठ्वंनिंचा सुगंध तेव्व्हा ,
मन्नत दरवळत होता,

ती सकाळ...
अचानक पाखरे किलबिलत करू लागली ,
त्यांच्या तलवार तुझ्या मधुर आवाजाची ,
जुलवा जुलाव सुरु झाली ,

ती सकाळी ...
वाटत होते ha क्षण ,
कधीच नाही संपवा ,
असाच पडून रहावा हा,
मनमोहक गारवा ,

ती सकाळ...
सकाळ नंतर येनारया ,
उन्हाची भीती वाटली ,
सुखा नंतर येनारया,
दुखची चाहूल लागली,

मनन मात्र पुन्हा एकदा ,
नव्या पहाटेची वाट पाहू लागले ,
कधी येणार कधी येणार,
ह्या एकाच प्रश्नाने त्रासले ...

ती सकाळ...
ती सकाळ...

क्षितीज दुरुन फार छान दिसते,

Share

क्षितीज दुरुन फार छान दिसते,
म्हणुन त्याकडे नुसते पहायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..

सुर्य चंद्र जिथे रोज उगवतात,
तिथे आपणलाही एक दिवस पोहचायचे असते.
म्हणुन त्याला आपण गाठायचे असते..

जितके आपण पुढे पळू तितके तेही पळते,
पण आपण मुळीच कंटाळायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..

खुप लोक असेही असतात जे मागे ओढतात,
पण आपण क्षितीजाचेच ध्येय ठेवायचे असते.
कारण त्याला आपण गाठायचे असते..

एक दिवस कळते आपण बरेच अंतर कापलेले असते,
आणी तरीही क्षितीज तिथुनही तितकेच दुर असते.
पण मागील लोकांना आपण क्षितीजावरच असल्याचे भासते..

तिथेही आपण थांबायचे नसते, पुढे पुढेच जायचे असते,
क्षितीज अजुनही दुर असते, त्याला आपण गाठायचे असते..
त्याला आपण गाठायचे असते..

माझं खरच चुकलं...

Share

मनात नव्हतं गंपण ते होऊन गेलंमाझं विचित्र वागणंतुला दुखाऊन गेलं...माझं तसलं वागणंमला आता छळतयमाझं खरच चुकलंमला आता कळतय...तू मला बोलून घेस्वतःला जाळू नकोसकाहीही शिक्षा कर पण मला टाळू नकोस...आता माझ्या जगण्याचंतूच कारण आहेसतुझं दूर जाणं म्हणजेमाझं मरण आहे...

मी तुझ्यावर प्रेम करतोय!!!

Share

 मी तुझ्यावर प्रेम करतोय!!!




तुझं ते निरागस बोलणं
मला खुप आवडतं ,
चारचौघातही तुझ वेगळेपण
अगदी आपसुखच जाणवतं!!!

डोळ्यात तुझ्या दिसुन येतो
माझ्यावरचा अतोनात विश्वास,
खळखळून तुझ हसणं
खरंच वाटतं झकास!!!

तुझा तो मिश्कीलपणा
आणि ते खोड्या करणं,
जरा जरी रागावलो मी तरी
चट्कन डोळ्यातनं पाणी काढणं!!!

माझा प्रत्येक शब्द
तु किती सहजपणे जपतेस,
सांग बरं ही कला
कुठ्ल्या शाळेत शिकतेस?

तुलाही फुलाप्रमाणे जपण्याचा
मी आटोकाट प्रयत्न करतोय,
अभिमान वाटतोय मला माझा
की मी तुझ्यावर प्रेम करतोय!!!

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं !

Share

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं !

भरं ऊन्हात पाऊस घेवुन आभाळ मनात दाटतं !

तरी पाऊलं चालत रहातात, मनं चालत नाही !

घामाशिवाय शरिरामधे कुणीच बोलत नाही!

तितक्यात कुठुनं एक ढग सुर्यासमोर येतो ,

तितक्यात कुठुनं एक ढग सुर्यासमोर येत….

ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो…

वारा ऊनाड मुलासारखा सैरावैरा पळत रहातो…..

पानाफुला, झाडांवरती छपरावरती चढुन पहातो……..

दुपार टळुन संध्याकाळचा पुन्हा सुरु होतो खेळ…

ऊन्हामागुन चालत येते, गारं गारं कातरवेळ…

चक्क डोळ्यांसमोर त्रुतु कुसं बदलुन घेतो!

पावसाआधी ढगांमधे कुठुन गारवा येतो………

आजही मला ते सर्व आठवतयं

Share

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत College कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधीउपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Submission copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं............ .

तू अशीच आहेस,

Share

तू अशीच आहेस,
एकटी एकटी जगनारी.....
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी.....

तू अशीच आहेस,
खुप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारी .....

तू अशीच आहेस ,
जीवानाच मर्म जाणनारी..
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म माननारी....

तू अशीच आहेस,
दुखाःतही नेहमी हासनारी....
अन हसत हसता
नियतीला लाजवनारी ...

तू अशीच आहेस,
इतरांना सतत प्रकश वाटणारी ....
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आटनारी ......

तू अशीच आहेस,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारी .
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन रहणारी ........

* सोन्याचा गोळा **

Share

* सोन्याचा गोळा **

अहाहा ! कित्ती उबदार आहे हा सोन्याचा गोळा
गोल गोल गरगरीत
पिवळा धम्मक
ह्याला
घरी नेऊन छतालाच टांगून ठेवते..

जास्त गरम झाला की
विझून टाकेन
जास्त थंड झाला की
जवळ घेईन..

बरं झालं
आज सकाळी लवकर उठले
नदीकिनारी फिरायला आले
तर हा अस्सा हळूच
नदीकिनारहून वरती चाललेला..
हम्मम्म,
आता
ह्याला अलगद खाली घेते
अन कुणी बघायच्या आत
घरी पळवून नेते..

उद्या मी मेल्यावर...

Share

उद्या मी मेल्यावर...
फक्त दोन अश्रु ढ़ाळणार कोणीतरी असाव...
सांत्वन नाही केल जरी कोणी ...
तरी त्याच ते दुख: खर असाव...

उद्या मी मेल्यावर...
सगळ इथेच असणार आहे...
पण माझ्या फोटो कड़े पाहून...
ओठावर हसू आणि डोळ्यात वेदना ठेवणार कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर
विसरले जरी सगले तरीही....
माझी आठवण ठेवून श्वास घेणार कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर
माझ्या आठवणीत जागुन रात्र काढणार...
माझ्या फक्त माझ्या कुशीत शिरण्यासाठी तळमळणार कुणीतरी असाव...

ही कवीता फॉरवर्ड करा

Share

ही कवीता फॉरवर्ड करा
ही कवीता फॉरवर्ड करा, नाही तर पाप येईल
रात्री झोपल्यानंतर, तुमच्या घरात साप येईल

पाच जनांना फॉरवर्ड करा, हरवलेली वस्तू सापडेल
नाही केली तर, भूत तुम्हाला कानाखाली झापडेल

दहा जनांना फॉरवर्ड करा, सोन्याचा हार मिळेल
नाही केली तर, पाठीवर चोप बेसुमार मिळेल

पंचवीस जनांना फॉरवर्ड करा, स्टॉक मार्केट वर चढेल
नाही केली तर, कावळ्याचे शिट डोक्यावर पडेल

पनास जनांना फॉरवर्ड करा, नोकरीत प्रमोशन होईल
नाही केली तर, सकाळ संध्याकाळ लुज मोशन होईल

शंभर जनांना फॉरवर्ड करा, लॉटरी मिळून जाईल
नाही केली तर, बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाईल

आरंभ - अंत

Share

त्याला चांगलं माहित असतं
ज्याला आरंभ असतो
त्याला अंतही असतो

म्हणून अंताचा विचार केल्याशिवाय
तो कशाला आरंभ करत नाही
काही नीट संपवता येत नसेल तर
तो सुरू करत नाही

ज्या ठिकणी जायचं असतं
त्याचा रस्ता सोडत नाही
आणि जिथे जायचं नसतं
तिकडचा पत्ता विचारत नाही

तो ध्येय किंवा लढाई निवडताना
अंताचा विचार करतो
"मी कशासाठी, कोणासाठी लढतोय?
मी कुठे जातोय, काय करतोय?
हे सगळं मला पटतय का?"
या प्रश्नांना उत्तरं मिळाली नाहीत
तर तो पुढे जात नाही

पण एकदा लढायचं ठरवलं की
माघार पत्करणार नाही
पराजय चालणार नाही
मरण आवडेल पण
अपमान खपणार नाही

जे सुरू केलय त्याचा
अंत नीट झालाच पाहिजे
वाईट माणसं जिंकली तरी चालेल पण
चांगला माणूस हरला नाही पाहिजे

इच्छापत्र

Share

इच्छापत्र
माणूस म्हणून मी
कणाकणा ने संपतोय
भावनांचे ओलावे
अन्
शब्दभंडार
आता रिते झालेत
काळ बदललेल्या वाळवंटात
सावल्या मृगजळामागे
धावू लागल्यात
आता त्या कविता प्रसवत
नाहीत,
शब्दाना गार्‍हाणे घालून
कवितेचा कौल मिळत नाही.

माझ्या अपूर्ण आयुष्यात
पूर्णांक नसेलही परंतु
आता काहीच तडीस जात नाही
हा अंत आहे वा प्रतिभेचा र्‍हास
हेच असेल तर
इच्छापत्राची वाट मोकळी करणे
गरजेचे आहे.

माझा उरलेला सहवास मी
माझ्या धूक्यात दडलेल्या गावास
अर्पण करतो,
आईची चोळी कधी माझ्यासाठी
ओली झाली असेल ती उरलेली
ओल मी विधेवेच्या मोकळ्या
केशसंभारात माळतो
प्रेयसीने दिलेल्या चुंबनाचा गोडवा
रात्र जागणार्‍या वारांगणेवरुन
ओवाळुन टाकतो.

प्रेयसीला नाकारलेल्या प्रेमाचा
अंश,
प्रतारणे नंतरही तिने केलेली मोकळी वाट
गर्भपातानंतर तिने गाळलेले आश्रू
ह्यांचे देवार्पण व्हावे
अन् माझी रक्षा पात्रास मिळताच
त्यानी रक्षेस कवेत घ्यावे.

ज्या मित्रांच्या मैत्रीत
आबालालाजी रेहमानान्ची अमूर्तता
होती
ज्यांच्या आलिंगणात
आधाराची ओढ होती
ते सारे सारे मी वार्‍यावर उधळायला
तयार आहे,

माझ्या शब्दांची "ग्रेस " मी कवितेच्या
दानपेटीत टाकतो,
माझ्या कवितांचे गूढार्थ मी हिरे
म्हणून ताजमहालवर चिटकवायला
तयार आहे
माझ्या कवितांच्या विटान्चे
थडगे झालेच तर मी माझे
शरीरही द्यायला तयार आहे.

फक्त इतकेच लिहा
थडग्यावर :
" मन कशात लागत नाही
आदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झार्‍यावर रात्री
मज ऐकू येतो पावा "

देऊळ बांधीले तुला

Share

देऊळ बांधीले तुला ( गझल )
देऊळ बांधीले तुला, अन दगड तू झाली सखे
तोडीत राहीले फुले, काटेच तू झाली सखे

खोदीत राहीलो उगा, नाही झरा कोठे मला
शोधीत राहीलो तुला, तृष्णाच झाली तू सखे

फोडीत राहीलो दगड, नेण्यास मेणा हा तुझा
वाटेत माझ्या आडवा , पाहाड झाली तू सखे

लावीत गेलो झाड मी , ती सावली वाटेवरी
पाहावले नाही तुला, कुर्‍हाड झाली तू सखे

स्वप्नात पाहीली कधी, तुझ्यासवे मी काटतो
जाळीत मज मी चालतो, ती वाट झाली तू सखे

प्रकाशाच्या सूक्ष्म कणा

Share

प्रकाशाच्या सूक्ष्म कणा
तिमिराच्या गर्भात लोपलेल्या
प्रकाशाच्या सूक्ष्म कणा
उठ जागा हो
उसळून ये चिरीत अन्धाराचे काळीज
आणि करून टाक सारा आसमन्त तेजाने झळाळणारा

विच्छीन्न कर सारी गावे
अन्धाराच्या साम्राज्याने माखलेली
आणी दे प्रकाश शलाका त्या चिमुरड्यान्च्या चेहेर्यावर
ज्यान्च कोमेजतय बालपण
त्या उन्मत्त काळ्या उकिरड्यात

उजळून टाक ती तम विहीर
मूक आक्रोशाने निनादलेली
आणी सार्थ कर त्यान्च निरपराधित्व
धुवून टाक त्यान्च्यावरचा कलन्क
बरसून अगणित प्रकाश रेषा

प्रकाशाच्या सूक्श्म कणा
विसरू नकोस तु तुझ कार्य
विसरू नकोस कधीच
जरी आहेस तु अति सूक्श्म
तुझ्यात्च आहे शक्ती
अन्धाराला मात देण्याची
उठ, जागा हो
बरसू देत अगणीत तेजो धारा
आणी लयास जाऊदे अन्धार सारा

आरक्षणही आरक्षण गडे

Share

आरक्षणही आरक्षण गडे
इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली पोट भरे;
वायूसंगे रोग फिरे;
नभात भरला
दिशात फिरला
जगात उरला
रोग पसरतो चोहिकडे
आनंदी- आनंद गडे

आरक्षण सोनेरी हे
कोणासही हसवते आहे,
भुलली विद्या परिणामे
आनंदे गाते गाणे
मेघ रंगले
चित्त दंगले
गान स्फुरले,
इकडे तिकडे चोहिकडे
आरक्षणही आरक्षण गडे!

दिल्लिमधि ना क्षेत्र असे
डोकाउनी हे पाहतसे;
कशास बघते? डोक्याला! (छे: छे:)
मंडल भेटला का त्याला?
जयामधे जो
सदैव बसतो
सूखे विहरतो
इकडे तिकडे चोहिकडे
आरक्षणही- आरक्षण गडे!

वाहते रुधिर मंदगती
जळती लतिका लक्षावधि
पक्षी मनोहर कूजित रे
कोणाला सांगतात बरे?
कोमल हे सगळे,
भर भर मारले डौलात पडले,
इकडे तिकडे चोहिकडे
अनागोंदीही आनंद असे

'अर्था'च्या बोज्यात
किती पोरे मरतात
त्यांना प्रतोद असा मीळतो
सोडून 'अर्था' तो जातो
वेष संपला
सत्वर मेला
आता उरला
इकडे तिकडे चोहिकडे
आरक्षणही आरक्षण गडे

एनिमसजचा वीर

Share

एनिमसजचा वीर

जंगलात एक एकटी वाट
वरून पडता पाऊस
भोवती झाडी आणि धोका
जंगली प्राणी आणि त्यांचे आवाज
या सगळ्यांच्या मध्यात
डोळ्यात वीज आणि डोक्यात वादळ घेऊन
तो एकटाच उभा असतो

हातात ढाल आणि तलवार
अंगावर भिजलेल्या चिल्खताचा भार
शरीर आणि मनाला कसलाच नाही आधार
डोक्यातल्या वादळाला नाही सुमार
तरीही तो एकटाच उभा असतो

तो हलत नाही
तलवार हलत नाही
ढाल हलत नाही
विचार चालू असतात
मन धावत असतं
तो तसाच एकटाच उभा असतो

मी काय केलं, कुठे चूकलो
जे झालं ते का झालं
भविष्यात हे कसं टाळता येईल
आता पुढे मी काय करु
इथून कुठे जाऊ
हे स्वत:ला विचारत
तो दु:खात एकटाच उभा असतो

जे झालं ते धुऊन टाकायला
तो पावसात उभा असतो
जे झालं ते धुऊन टाकायला
हा पाऊस पुरेसा पडेल का?
हा पण विचार डोक्यात डोकावतो

हे एक वाईट स्वप्न तर नाही ना
हे बघायला तो तलवारीवर बोट घासतो
बोटातलं रक्त खरं आहे
जे झालं ते, जे होतय ते,
जे होणार आहे ते
सगळं सगळं खरं आहे
पण मला दु:ख का होत नाही
रक्त निघालय बोटातून तरी
मेंदू त्याच्याकडे लक्ष का देत नाही?
हे विचारत, एकटाच उभा असतो

दर लढाई नंतर हे का होतं
जीवनाला अर्थ नाही असं वाटतं
अस्थित्त्व हदर्ल्यासारखं वाटतं
आणि सगळं शांत, सून्न पडतं
उद्या सकाळी सूर्य परत उगवेल
रोज जे होतं ते होईल
पण मी कालच्या ’मी’ सारखाच असेन का?
आणि नसलो तर कसा असेन?

डोळे मिटतात आणि तो
जिथे उभा असतो तिथेच
डोळ्यात वीज आणि डोक्यात वादळ ठेऊन
हातात ढाल-तलवार घेऊन
एकटाच झोपतो

बदल

Share

जग बदलत असतं
लोकं बदलत असतात
काळाचं चक्र फिरत असतं
मनातले विचार बदलत असतात

तो तलवार दगडावर रगडतो
ढाल घासून चमकवतो
चिल्खत स्वच्छ ठेवतो
हेच त्याचे मित्र असतात
लढाईत सोबत असतात
तो त्यांच्यावर प्रेम करतो
त्यांना जपतो, आदर देतो

नदीत उडी मारतो
स्नान करतो, अंग स्वच्छ ठेवतो
जखमांवर औषध लावतो
शरीरयंत्राची दुरूस्ती करतो

शरीरानंतर मनाकडे लक्ष देतो
विचारांवर काबू ठेवतो
चांगले विचार मनात ठेवतो
वाईट काढून टाकतो
मनाची बाग टाप - टीप ठेवतो
त्यात पाणी आणि खत पुरवतो

तो स्वत:कडे लक्ष देतो
सतत सुधारणा करतो
तो बदल स्विकारतो

तुझ्या येण्याने होतील

Share

तुझ्या येण्याने होतील
फूले जागे होइल किलबीलाटरे
अताच झोपली असेल
सजनी माझ्या आठवनितरे

थांब दिनकरा थांबरे...

अताच भेटलो तिजला
स्वप्नात तीच्या मी
प्रितीचे गीत गायला
पसरवू नको प्रकाशरे

थांब दिनकरा थांबरे...

सांडले गवतावर मोती
बनवेल हार म्हणतो
तू येण्याने नाहीसे होती
वेचलेले ओजळीत माझ्या

थांब दिनकरा थांबरे...

खिडकीतूनि किरने तुझी
डोळ्यावर तीच्या पडतात
मीच स्पर्श करतो
हे भास तीला होतात

थांब दिनकरा थांबरे...

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पतंग जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पतंग बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा

तीने स्वप्नांतही मला ना सोडल कधी

Share

तीने स्वप्नांतही मला ना सोडल कधी
बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पतंग जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पतंग बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा

रेशिम

Share

मोठ्या अभिमानाने मी म्हटल
नक्कि जमेल मला तुझ्याशिवय रहायला
एवढ काय त्यात
पण एक रेशिम रुतुन राहील
तुझ्या नि माझ्या नात्यात
सतत खुपत राहील
रुतून बसल मनात

निघता निघत नाही
सुटता सुटत नाही
तट्कन तोडून टाकण
माझ्या स्वभावातच नाही

पुढे तर जायचय मला
थाम्बून चालणार नाही
जगाची ही धोपट वाट
माझ्याच्यानी चुकणार नाही

तेव्हा आता

या रेशमाबरोबर
मझी थोडी स्पन्दने ठेवते
सतत धडकत ठेव त्याना
एव्हडीच आज मागणी करते

बोलली अबोली ग

Share

बोलली अबोली ग
बोलली अबोली
काय होते पोटात
आज आले ओठात
असा होता निर्धार
नाही काही बोलणार
परी होता अनिवार
बोलली अबोली ....
बोलता परी तिला
समजुनी गेले
आपले आहे
काहीतरी चुकले....
सारे पाणी गेले
पालथ्या घड्यावरी
तरी करुनी निर्धार
बोलली अबोली
ग बोलली अबोली
अबोलीचे बोल
लागले जिव्हारी
परी नव्हते तिला
त्याचे ग काही
तिच्या त्या जखमा
वहाती भळाभळा
त्यांची न होई
जाण कुणा...
बोलली अबोली
ग बोलली अबोली

आता मी फ़क्त

Share

आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
मलभ मना वरच दूर करून , प्रेमाचा वर्षाव करणार

आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
भाव माझ्या मनाचे ,न सांगताच जो ओळ खनार

आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
ओंजलित घेउन अश्रु माझे , मोती बनुन बरसणार

आता मी फ़क्त त्याची वाट बघणार
बंद कली मनाची ज्याच्या सहवासाने खुलनार
आता मी फ़क्त त्याची
फ़क्त त्याची वाट बघणार
प्रेम करतोय ,करत राहील
जो माझ्या नशिबात असणार

सकाळ

Share

सकाळ होते, तो उठतो
पाऊस थांबला असतो
तो उभा राहात नाही
तो चालायचं ठरवतो

चिल्खतावरचे डाग काढतो
अंगावरची घाण झटकतो
मेंदू पुसून स्वच्छ करतो
तो चालायचं ठरवतो

कुठे जायचं ते माहित नाही
परत चालता येत नाही
पण वीर थांबत नाहीत
म्हणून तो पण थांबत नाही
आकाशाकडे ध्येय मागतो
तो चालायचं ठरवतो

सुरवातीला थोडा लडखडतो
दिशा शोधतो, अंत शोधतो
अंताकडे जायचा रस्ता मांडतो
शेवटी तो चालायला लागतो

उत्साह परत येतो
आत्मविश्वास परत येतो
अभिमान परत येतो
तो एनिमसजचा वीर असतो
तो चालायला लागतो

सोमवार, २७ एप्रिल, २००९

चारोळी

Share

मन असत आपल नाजुक ,
सुकुमार आणि अलवार ,
दुखवल, तर घालायची आपणच ,
त्यावर फुंकर हलुवार.............

******************************

वेदनांवर त्याचा आपण
कशी फुंकर घालणार
सांग, पण मनाच्या मनातलं
आपण कसं जाणणार

******************************

मनाला पण मन असत ?
हे प्रथमच कलल मला ....
चल , जाउन शोधते मी,
माझ्या मनातल्या मनाला !

******************************

नक्कीच सापडेल जर
तुझ्याकडे असेल तर
कदाचित सापडणार ही नाही
कुणाला दिले असेल तर

******************************

खरच, मन नाही, अस वाटतय,
फार पूर्वी दिलेल रे , एकाला , जपून ठेवायला ,
परत घेतल्याचे आठवत नाही,
जर असेल परतलेल माझ्याकडे,
तर इथेच ठेवतो ,
आता त्याला कुठे पाठवत नाही.

******************************

कळत नाही मन कुठे गेले होते
गाव चुकीचे होते, की रस्ता चुकीचा होता
विचारून घे एकदा त्याला
नाव चुकीचं होतं, की पत्ता चुकीचा होता

******************************

अरे,मनाला कुठल माहित नाव अणि गाव ,
एक अनामिक ओढीने गेल धावून ,
भेटीने सुखावल्यावर, राहिल तिथेच ,
आता नाही येत परतवून ......

******************************

अग पण त्याच्या शिवाय
करमेल का तुला ?
मोकळ्या मनाने एकटे रहायला
जमेल का तुला ?

******************************

जपल्या होत्या मी किती आठवणी
एकुनेक पुसून गेली आहे
तुझ्या एकटीचीच आठवण फ़क्त
आठवणीत राहिली आहे

******************************

चारोळी

Share

अग ,आन्धल ,पांगल,काही नसत ग,
बुद्धि वर आलेली झापड़ असतात.
भल्या -भल्यांची,प्रेमात झालेली माकड असतात.

******************************

प्रेमाबद्दल बोलायचं म्हणजे
शब्द ही पडती अपुरे
दोन मने जुळायला
प्रेमाची एकच जाणीव पुरे

******************************

प्रेम कुठे ही जात नाही,
ते हृदयात कायम असत.
मनालाच वाटत उगाच ,
ते प्रेम कधी कमी आहे, कधी जास्त !!

******************************

खरे प्रेम कधीच मनातून काढून टाकता येत नाही,
पण का? प्रेम केलेल्या व्यकती ला ही थांबवता येत नाही,
खरे प्रेम करताना ते कधीच मोजून-मापून होत नाही
तरी का मनाला ते वाटते,प्रेम.. कधी कमी, कधी जास्त.....!!

******************************

मन न ,खुप चंचल असत,
दिसली हिरवल, की घुसनार्या वासरासारख ,
बांध घातला तरी, वाट फुटेल तिथे
वाहात राहणार्या पान्यासार्ख....
म्हणुनच त्याला प्रेमाची
जास्त कमी महसूस होते,
प्रेम अविचल असत हृदयात, तरी
मन उगाचच कासाविस होते.........

******************************

मन कासविस होते......
जेव्हा वार्‍या सारखे वाहूनही हिरवळ मिळत नाही..!!
मन कासविस होते.......
जेव्हा पाण्यासारखे वाहूनही किनारा मिळत नाही...!!
मन कासविस होते......
जेव्हा मनाला चाहूल लागते ह्दय तडकण्याची.....!!

******************************

मनातच असू दे रे मनाची हालत
दुनियेसमोर सांगू नका
सर्वांसमोर सांगून त्याला
चार चौघात लाजवू नका

******************************

चारोळी

Share

तू समोर असली की तूझी
आठवन काढत बसतो
तू दूर गेलीस की तुझ्या
आठवणी साठवत बसतो

******************************

एखादा पदार्थ बिघडला ,
की दुरुस्त नाही करता येत,
अगदी जिवलग मैत्रिनिनी केला असेल तरी,
डोले मिटून फस्त नाही करता येत...!!

******************************

सगली सुखं
तिच्याबरोबर वाटून घेइन
विष जरी दिले मला
ते ही डोळे मिटून घेइन

******************************

विष पचवलस,तर नीलकंठ होशील,
आवडेल का ते तिला ?
शोभून दिसेल का रे ते
तिच्या गोर्या रंगाला ?

******************************

प्रेमात पहु नए
रंग आणि रूप
दोन मनानं फ़क्त
व्हावं एकरूप

******************************

रंग आणि रूप पाहून प्रेम कधीच करू नये,
मानाने जडलेल प्रेम च खरे प्रेम असते,
पण हे फक्त चारोळित च वाचायला छान वाटते,
कारण ह्या जगात मनापेषा रंग आणि रूप नेहमीच वरचढ ठरते.......

******************************

रंग रूप बदलत जातात
बदलत जातात माणसांची आवर्तनं
खरं प्रेम बदलत नाही
बदलतात ती निव्वल आकर्षणं

******************************

मानसाचे आवर्तन बदलले की माणसे ही बदलतात,
माणसाचे आकर्षण बदलले की ,पसंती ही बदलते,
खरी खरी वागणारी माणसे मग खोटी वागयाला लागतात,
मग खरे प्रेम बदलले नाही तरी आपले आयुष्य नक्की बदलून जाते......

******************************

प्रेमात पहु नए
रंग आणि रूप
दोन मनानं फ़क्त
व्हावं एकरूप

******************************

प्रेम आंधल असत अस म्हणतात ,
पण प्रेमी तर डोलस असतात ना ?
डोळे उघडे ठेवून केलेल प्रेमच खर,
नाहीतर फसवल , अस म्हणतात ना ?

******************************

खरंच, प्रेमात पडल्यावर
माणुस होतो का आंधळा?
बरं-वाईट हि न झेपण्याइतकं
होतो का तो पांगळा??

******************************

चारोळी

Share

सावली मिळते तेंव्हा जाणवत ,
उन्हाची काय तलखी असते ,
तुफान गर्दीतही जाणवत ,
की आपली एकांडीच एक पालखी असते .

******************************

कुणी एकाकी ना निघून जावे
येईल त्याला सोबत न्यावे
उन्हात ही, चालेल रस्ता पुढे
आपण त्याच्या पाठी चालावे

******************************

चालता चालता अडखळलो
यात मला दोष कशाला ?
जाणतो, कुणी पेरले दगड रस्त्यात
आपल्याच माणसावर रोष कशाला ?

******************************

येईल त्याला सोबत घेणे,
मनाला काही पटत नाही ,
अनामिक भीतीचा पगडा ,
काही केल्या सुटत नाही...

******************************

अग एकटी गेलीस तर
ख़रच एकटी पडशील
एकांतात कुणाच्या खांद्यावर
डोकं ठेवून रडशील ?

******************************

पावल नेहमी जपून टाकावी,
ठेच लागली ,तर शहाणा व्हाव ,
दिसत नसेल रस्ता साफ़ ,
तर चश्मा पुसून पहाण व्हाव .....

******************************

रस्ता पाहनं होतच नाही
तू समोर दिसलीस की
चश्मा पुसनं होतच नाही
तू सोबत बसलीस की

******************************

रविवार, २६ एप्रिल, २००९

खरं तर आठवणीच आयुष्यं भर साथ देतात

Share

खरं तर आठवणीच आयुष्यं भर साथ देतात
माणसे मात्र नुसतीच सोबत करतात......

आठवणींना साठवून हसता येतं, रडता येतं
सोबतच्या माणसांना याचं सोयरं सूतक ही नसतं.....

त्या मनाच्या खोल कप्प्यात दडवता येतात
निवांतात मग त्या हळूच पापणी उघडतात......

हिशेब नसतो आठवणी किती जमतात
अनेकदा उलगडल्या तरी हव्याच असतात.........

मुंबई कोणाची?

Share

मुंबई कोणाची?
.



बाळू तसा बावळा
म्हणवून घेतो मावळा
याच्या त्याच्या भाषणाने
सदां-कदा पाघळला

मुंबई कोणाची?
महाराष्ट्राची...

मुंबई कोणाची?
मराठी माणसाची...

मुंबई कोणाची?
कष्टकर्‍यांची...

मुंबई कोणाची?
स्वप्नपहाणार्‍यांची...

मुंबई कोणाची?
भारताची...

मुंबई कोणाची?
याची, त्याची, माझी...

मुंबई कोणाची?
प्रत्येक आल्या गेल्याची

मुंबई कोणाची?
माझी सोडून सर्वांची

मी कोण
मी कुठला
माझ्याच घरात
जणू पाहुणा
तर मराठी मानसा जागा होओ.......
ही आपुली माती आहे कुना दुसर्याची नाही......
मी महाराष्ट्राचा अणि महाराष्ट्र माझा ......-शिवाजी महाराज .....!!!!!

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये

Share

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये
कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर हृदय कधी
तर जोडताना असह्य यातना व्हावी ,

डायरित कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पनाना ते नाव जड व्हावे
अचानक एक दिवस त्या नावाचे
डायारीत येणे बंद व्हावे ,

स्वप्नात कुणाला असेही बघू नये
की अन्धारताही त्याचे हात असावे,
तुटलेच जर स्वप्न कडी
तर आपल्या हातात काही नसावे,

कुणालाही इतका वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा
एक दिवस आरशात आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा ,

कुणाचे इतकेही एकू नये
की आपल्या कानात त्याच्याच शबदाचा घूमजाव व्हावा
आणि एक दिवस आपल्याच तोंडातून
त्याच शबदाचा उचार व्हावा ,
पण
कुणाच्या इतकेही दूर जाऊ नये
की आपल्या सावली शिवाय आपल्या सोबत काहीच नसावे
दूरदूर आवाज दिला तरी
आपले शब्ड जागीच घुमावेत.

माणसाने समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा..

Share

माणसाने समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा..

लाटेसार्खे येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा..

किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही

त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन

दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा...

त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी

अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी..

पण त्या लाटेत गुन्तायचे नसते किनारयाने

कारण निमिशात त्याची स्वप्ने भन्गतात एका नविन आघाताने...

म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा

शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात

Share

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
गोड बोलण्यानंच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानंच होते!

प्रेमात दोघं असतात तेंव्हा
सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं
पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!

प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा
'हात' एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठी
राजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच
एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
एकमेकांना झब्बू देण्यानं होते!

प्रेमामधे एकमेकांबद्दल
जे जे काही कळलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून
एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
छळून छळून छळण्यानं होते!

एकमेकांच्या वागण्यामधे
आपल्याला फक्त चुका दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे
चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे होणार नाही वाटतं
ते ते सारं घडत जातं
प्रेमकथेच्या शेवटी शेवटी
सारं सारं बिघडत जातं

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय....

Share

सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत

असाव कुणीतरी......

Share

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................

असाव कुणीतरी .....
फक्त आपल असणार....
कुठे ही असल तरी कायम रुदयात असणार .....

दु:खाच्या घरी एकदा

Share

दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कुणाच्या ही नजरेत..."

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुद्धा फ़िरतोय
दु:खाला शांत करायचा
खूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी!

जसं अतूट नातं असतं

Share

जसं अतूट नातं असतं
पाऊस आणि छत्रीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

अंगरख्याच्या आत असतं
मुलायम अस्तर जरीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं हळुवार बंधन असतं
श्रावणाशी सरीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं नातं लाटांचं
किना-याशी खात्रीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

श्रीयुत बबन

Share

श्रीयुत बबन
मिस्टर अँड मिसेस बबन,
हे एक जोडपं भन्नाट होतं...
तिचं वजन सत्तरच्या वर,
तर त्याचं फक्त पन्नास होतं!

ती होती मस्त गुळाची ढेप,
बबन नुसताच काटकुळा ऊस...
मिस्कीलपणे त्यांच्या जोडीला,
लोकं म्हणती "उंदीर आणि घूस"!

एकदा तिने बबनला विचारलं,
माझी वाटते का रे तुला लाज?
हसून बबन म्हणाला तिला,
परत बोलू नको, बोललीस जे आज!

बारीक वा जाडी तू माझी आहेस,
तुझ्याशीच गुंफला प्रेमाचा धागा आहे...
कितीही आकार वाढला तुझा तरीही,
हृदयात मावशील एवढी जागा आहे!

उत्तर ऐकून ती फार सुखवली,
आनंदाने तिची हास्यलाली फुलली...
तुम्हाला वरलं हे माझं सौभाग्यचं आहे,
पुन्हा पुन्हा ती हे प्रेमाने बोलली!

मित्रांनो तुमच्यातही एक बबन आहे,
कदाचित झोपला असेल, त्याला जागवा...
आणि बायको कित्तीही वाढली तरीही,
बबनप्रमाणेच तिला प्रेमाने वागवा!
बबनप्रमाणेच तिला प्रेमाने वागवा!!
बबनप्रमाणेच तिला प्रेमाने वागवा

वाहावत गेलो तरी

Share


वाहावत गेलो तरी असे वहावे
जसे नदित सोडलेले तेवते दिवे
भरकटालो कधी तर अस जाव
जसे रेशमी ढगांचे उड़ते थवे
कधी रेंगालावासे वाटलाच तर
तर असे कही रेंगालावे
निष्पर्ण झाडावर पानगलीतल्या
एकच पान जसे फडफडावे
पर्तावास वाटले मागे
तर लाटेसारखे यावे उसलत
कधी भरून आलोच आतून
तर रीते व्हावे चिम्ब कोसळत
आयुष्याच्या वाटेवरती
एक तरी गाने गाव
गाता गाता समोरच्याला
समाधानाचे दान द्यावे .....................

परवा भेटला बाप्पा

Share

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला

दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला

उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला

मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?

मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस

मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक

तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक

इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो

भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो

काय करू आता सार मॅनेज होत नाही

पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत

इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग

तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग

चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात

माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात

माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन

मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन

एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?

डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?

असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक

तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक

म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको

परत येउन मला दमलो म्हणायला नको

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश

माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस

सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप

ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप

मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं ?

म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं !

पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं

सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं

हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव

प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव

देशील आणून परत माझी हरवलेली नाती

नेशील मला परत जिथे आहे माझी माती

इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं

आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं

कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर

भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार

य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान

देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?

"तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला

सारं हाताबाहेर गेलंय पोरा "सुखी रहा" म्हणाला बाप्पा माझा.

मी तुझ्याबरोबर खेळतो

Share

मी तुझ्याबरोबर खेळतो
तेच मुळी हरण्यासाठी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसु भरण्यासाठी!

प्रेम होतं किंवा केलं जातं
यावर पुर्वी पासुन वाद आहे
पण एक मात्र नक्की,
जो प्रेमात पडला...
तो वैयक्तिक जीवनात बाद आहे!

प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!

तु कौलेजला आलीस की
माझी नजर तुझ्यावर खिळते
त्यातुनच पुढचं आयुष्य जगायची
स्फुर्ती मला मिळते!

तु इतकी सुंदर आहेस की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल!

प्रेमे मिळणं ही सुध्दा
एक कला आहे,
पण मी प्रेम मिळवु शकलो नाही
याचं दु:ख मला आहे!

शाळेत मुलीच्या बाजुला बसणं
ही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावं
ही माझी छोटीसी अपेक्षा होती!

चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!

कौलेजच्या कट्ट्यावर मुलींना छेडणं
हा जणु काही आमचा खेळ होता
परीक्षेच्या दिवसातही ह्या गोष्टींसाठी
प्रेत्येकाकडे बराच वेळ होता!

प्रेमभंग म्हणजे
मुका मार आहे,
जखमा दिसत नसल्यातरी
वेदना फार आहे!

उघडून दार मनाचे बनावी कविता

Share

उघडून दार मनाचे बनावी कविता
कळत नकळत सुचावी कविता
विसरून भान सारे रचावी कविता
विश्वच माझे बनावी कविता
काळजाला सर्वांच्या भिडावी कविता
मनामद्ये घर करुन रहावी कविता
कधी पावसात भिजताना
चिम्ब चिम्ब भिजुनी जावी कविता
इद्रधनुश्यात सप्तरंगी होवून
वीरघलुन जावी कविता
स्वप्ना लाही हेवा वाटेल
आशी बनावी कविता
प्रत्येक सुखा दुखात
सोबत रहावी कविता
आयुष्याचा प्रत्येक वळनानुसार वळावी कविता
कोणी आसो नसों सोबतीला रहावी कविता

कवितेमध्ये जान असावी

Share

कवितेमध्ये जान असावी
पण शब्दांना वजन नसावे
हलके फ़ुलके येता जाता
सहजासहजी काव्य सुचावे

संध्याकाळि थकल्यानंतर
कवितेसंगत गप्पा व्हाव्या
गरम कॉफ़ीच्या घोटासोबत
छान छान चारोळी चखाव्या

वेळ असावी फ़ूलपाखरू
हळूच भुर्रकन यावी जावी
खांद्यावर हुळहुळ करताना
खुदकन एक कविता निसटावी

साथ मुलायम संग सुरमयी
गंध मंद अन रंग सावळा
शब्दामध्ये मौन गोजिरे
मौनामध्ये शब्द कोवळा

चिमुट चिमुट चव हर शब्दाची
चाखुन चोखून मस्त टिपावी
अर्थ असो वा ना शब्दांना
पण कवितेला जान असावी

ऐक सांगते मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...

Share

ऐक सांगते मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...

प्रेम व्यर्थ आहे, प्रेम पाप, प्रेम म्हणजे स्वातंत्र्याला शाप...
गुप्ततेचे ओझे मनावर, मानगुटीवर तिचा बाप...

प्रेम अग्नी, प्रेम युद्ध, प्रेम म्हणजे वेडेपणा शुद्ध...
मागावर तुझ्या नेहमी, भाऊ तिचा निर्बुद्ध...

प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे भ्रमवारा...
मित्रांशी संबंध तुटणार, मैत्रीपासुन दुरावा...

प्रेम म्हणजे दिवास्वप्ने, प्रेम म्हणजे जागरण...
आपल्या आवडी-निवडीवर बदलाचे आक्रमण...

प्रेम म्हणजे बंधन, प्रेम म्हणजे पाश...
पैशांचा होतो खुर्दा, अन वेळेचाही नाश...

म्हणुन सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...

मैत्री

Share

जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री"

या मजबूत रेशीम गाठी आहेत....

Share

या मजबूत रेशीम गाठी आहेत....
विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत

पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं

मात्रुभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं

वडाची झाडं मोठी होऊनही
परत मात्रुभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात

काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत

कही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल

Share

कही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल


शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.


मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे


मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे


मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे

Share

नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे

आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे

बरिस्तात जाऊन Coffie प्यायची

Share

बरिस्तात जाऊन Coffie प्यायची
की CCD तला थंड चहा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?

कधी Mc'd चा बर्गर खा
नाहीतर मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन एखादा पिक्चर पाहा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?

तिला घेऊन खडकवासला
की कार काढून लोणावळा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?

दररोज फोन calls आणि SMS
करावे लागतील तिला?
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?

प्रेम हा विषयच आमचा कच्चा
ह्याचा कोचिंग क्लास असेल कुठे तर पाहा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?

अहो, ह्या कसल्या
प्रेमात पडायच्या ना ना तऱ्हा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?

एकटं राहायचा ताप आलाय
म्हणून कविता लिहिण्याचा प्रपंच सारा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?

प्रेमाच हे गणित
कळलंय तरी का देवाला?
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
तुम्ही तरी काय सांगणार मला?

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

Share

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

काय सांगु माझ्या बद्दल

Share

काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

बोलायच खुप असत मला

पण बोलणं मात्र जमत नाही.


काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

दुखवल जात मला

दुखवता मात्र येत नाही.


काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

खोट खोट हसता हसता

रडता मात्र येत नाही.


काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

दुःखात सुख अस समजता

दुःख ही फिरकत नाही.


काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

बरोबर बरेच असतात

पण एकटेपणा काही सोडत नाही.


काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

चार शब्द सांगते

पण कोणी ऐकतच नाही.


काय सांगु माझ्या बद्दल

मलाच काही कळत नाही

मांडायचा प्रयत्न करते

पण शब्द ही मला पुरत नाहीत..

असं वाटतं

Share


असं वाटतं माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नाही
आजकाल मित्रांनो, असं का होतंय कळत नाही
पण असं वाटतं माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नाही

पूर्वी असं होत नव्हतं, असं कधी वाटलं नव्हतं
बरच काही सांगायच, मनात असं साठलं नव्हतं
सांगायला जरी गेलो तर शब्दच साले आठवत नाहीत
असं वाटतं माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नाही

नाही ही तक्रार नाही, तीच बिचारी खूप खूप करते
सकाळी उठल्यापासून खरंच तीच मर मर मरते
मुलं,नोकरी,स्वयंपाकपाणी कामांची यादीच संपत नाही
असं वाटतं माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नाही

पण पूर्वी असं होत नव्हतं तिला माझी ओढ़ होती
एखादा सिनेमा एखादी भेळ याच्यासाठी सवड होती
मी आणलेल्या गज-याकडेही आता ती पाहात नाही
असं वाटतं माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नाही

मलाही कळतंय आता आम्ही चाळिशीच्या जवळ आलोत
मुलं मोठी झालीत आता जवाबदा-यांनी गांजुन गेलोत
कळतंय मला की प्रत्येकवेळी उत्साह असू शकत नाही
असं वाटतं माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नाही

असं वाटतं ठरवून फक्त दोघांसाठी वेळ काढावा
संवाद व्हावा दोघांच्यात अन स्नेहभाव थोड़ा वाढावा
प्रेम तर असतंच दोघांच्यात पण सांगितल्याशिवाय राहावत नाही
अजूनही आवडतो

मित्र

Share


एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल.

मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे

कविता एक............

Share

कविता एक स्पंदन असते

कधी कधी रणकंदन असते

कविता अशी-अशी असावी

असे काही बंधन नसते

कधी अंतरातले र्हुदगत असते

कधी स्वत:चिच फसगत असते

घनदाट जंगल माजलेले कधी

कधी सुबकशी मशागत असते

चांदणं,आकाश,फुले असते

वेश्यावस्तीतील मुले असते

स्वर्ग काय अन नरक काय

कवितेला सारेच खुले असते

मोजुन मापुन जोडलेली असते

सफाईदारपणे खोडलेली असते

कधी अंगावरच येते जशी..

धरणाची भिंतच फोडलेली असते

ईश्वराला केलेले वंदन असते

देहाने केलेले आक्रंदन असते

कविता अशी-अशी असावी

असे [...]

रीता नसे........

Share


रीता नसे हा प्याला मीत्रा ..
रीता नसे हा प्याला मीत्रा काठोकाठ भरला रे ...
पुन्हा एकदा पहा जरासा कसा छलकतो आहे रे..
शब्द नाचती मला खुणवती गुंफुनी माला करण्या रे
पडतां बाहेर वीखरून जातील कुठून आणू लीहीण्या रे
अमृत ओठांचे त्या प्यालो अंश सोडला आहे रे
काठावरती पेल्याच्या बघ रंग गुलाबी चढला रे
गोड लाजरा रम्य साजीरा तीचा झळकतो मुखडा रे
चोरून तीरके पाहून मजला पेल्यामधुनी हसला रे कंठ न ओला झाला हा

चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे

Share

चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतीयाचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग
पश्चिमेच्या कागदाला केशरीया रंग
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय… देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय…
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा…

सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा
मध खाते माशी तरी सोंडेमध्ये डंख
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय… देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय…
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा…

कविता अशी नाही सुचत ग वेड

Share


कविता अशी नाही सुचत ग वेडे…….
कविता अशी नाही सुचत ग वेडे…….
त्यासाठी जाऊ द्याव्या लागतात कित्येक उदास रात्री………..
गळ्यातच घुसमटून मारावे लागतात व्यक्त होवू पाहणारे असंख्य अव्यक्त शब्द…….
न फ़ेडता ठेवावी लागतात जन्मव्यापी देणी, फ़ेडण्याची इच्छा असुनही……..
जगण्याचं नाटक करावं लागतं क्षणोक्षणी मरताना.
झाली आहेस का कधी घायाळ पानाच्या साध्या उन्मळण्याने?
फ़ुलपाखरु पकडतानाही त्याच्या दुख:ने झालीस का ग हळवी?
कधी पिंजऱ्याशी तासनतास [...]

कधीतरी वाटतं......................

Share


कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं
हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं
कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं

काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं
आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं
कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं

दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं
फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं
कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं

सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं
थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं
कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं

माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं
एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

ह्यालाच तुम्ही प्रेम बोला…..

Share

ह्यालाच तुम्ही प्रेम बोला…..
हसू तिचे सुखी मी
उदास ती बेचैन मी
दु:ख तिला यातना मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला
संग तिचा बेधुन्द मी
स्पर्श तिचा रोमांचीत मी
विरह तिचा मारतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला
नजर तिची घायाळ मी
बोल तिचे प्रसन्न मी
अबोला तिचा छळतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला
अश्रू तिचे कष्टी मी
राग तिचा अपराधी मी
मनातले तिच्या कळते मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला…..

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

Share


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

अशीच असते यौवन यात्रा

Share

अशीच असते यौवन यात्रा
शूल व्यथान्चे उरी वहावे
जळत्या जखमान्वरी स्मितान्चे
गुलाबपाणी शिम्पीत जावे

जखमा घ्याव्या जखमा द्याव्या
पण रामायण कशास त्याचे
अटळ मुलाखत जर अग्निशी
कशास किर्तन असे धूराचे

कुसुमाग्रजान्ची माफी मागून....

Share

सखे काढ गळ्यातले
तुझे चान्दण्याचे हात
झाडामागे दूरवर
मला दिसे तुझा बाप

माझी नाजूक मान अन
त्यान्चा जाडाभरडा हात
वळवूनी देती मला
एक पेकाट्यात लाथ

कानशिल वाजवूनी
माझी धरतील मून्डी
भर उन्हाळ्यात मला
वाजू लागलीये थन्डी

सखे हो ग तू बाजूला
तुझा बाप येण्याआधी
झाडाखाली या अन्यथा
होई माझी ग समाधी......

या अंधाऱ्या घरात, एक उजळ कोपरा.

Share

या अंधाऱ्या घरात, एक उजळ कोपरा.
कल्पणेत सुखावन्याचा हा नाद बरा.

अंतरांत तुझ्या आठवणींची मृदु शेज
जरि असतो पहुडत वाळवंटी रोज

काळे काळे सगळे डाग धुतले जातिल
नकळत आश्रूच ती सफाई करतिल.

कर्मयोग

Share


जळत्या श्वासांमध्ये मी सितार वाजवतो
आश्रूंच्या वर्षावात मी मेघमल्हार गातो
लक्ष विराणे असले म्हणुन काय झाले
मझे लक्ष केवळ वसंत ऋतू असतो.

लोपतील माझे इरादे, आहेत इतकी संकटे?
जीवन मृत्यु समासे मग भय का वाटे
लाटांशी जरी खेळती तिव्र वादळे
धैर्याहाती सोपवली नौकेची वल्हे

थेंबा थेंबास शीनलेल्या चातकात
कातळ फोडत्या काबाड कष्टात
सुख स्वतःच्याच स्वेदगंधात
त्याचेच कारंजे अयुष्यवटिकेत

तू नेहमीच माझ्या जवळ असतोस

Share

तू नेहमीच माझ्या जवळ असतोस
खूप खूप बोलतोस आणि मी हसतो
कधी मी बोलतो तु हसतोस.
मला आहे खात्री हा नाही भास.

तु जवळ असताना वाटत इतर कुणिच नसावे
पण तुच असतोस सर्वत्र द्वैत काहीच नसते
पण मला आहे खात्री हा नाही भास

कधी मला वाटले तुझ्या पसून दूर पळवे
पण माझ्या आतही तूच, हे कितिंदा कळावे
पण मला आहे खात्री हा नाही भास

रज तमाचा विटाळ केला, सत्वाचा धरला हेला
आराधण तुझी करता तुच मला सोडूण गेला
पुण्यपापाचा करता भेद तू दूर उभा राहीला.
अंतः बाह्य मग मी अंहकारी होरपाळला

माझे काहीच उरले नाही. देह कधीच हरवला मही
कर्म करता प्रवाही विकल्प उरला नाही.
आता आपपर भाव सत्व रज तम भेद नाही
भोज्य भोक्त निमित्त कर्म तूच सर्व पाही
तु इतका सर्वत्र राही की तु माझ्यशिवाय उरलाच नाही.

ती पतंग उडवणे सोडले

Share


मस्त झोपाळ्यांच्या त्या बागेत जाणे सोडून दिले.
चोरुन निवडून ओंजळभर कळ्या जमवणे सोडून दिले.

मोठ्या आशेने निवडून
मोत्यांच्या मुठी भरून
बालपणाने सजवले होते.
महत्वकांक्षेच्या वादळाणे
ते वाळूचे घरटे तोडले.

रंगासंगे उधळत होती
कधी पडत कधी तुटत होती
नव तंतूंसंगे पुन्हा नभी भरारती
घॊर निळ्या छायेत आता
ती पतंग उडवणे सोडले.

किती विषय होते बोलायला
शब्दो शब्दी हसायला
सर्व तालस्वरी पद थिरकती
आणि चलता चलता आशा गाती
स्वप्न स्पंदणाच्या चालीवर
आता विना विनंती मैफिलीत
ते गीत गाणे सोडून दिले.

ना आस ना शोध कोणते
ना ध्येय ना मार्ग कोणते
फक्त सरळ चालायचे.
मला माझ्या रस्त्यावर असा रस्ताच मी निवडलाय.

अश्रूधारांच्या मेधदाटे

Share

अश्रूधारांच्या मेधदाटे,
हास्याच्या उजळ पहाटे,
आम्ही तुलाच पाहिले
असो रात वा उजळे

पडकी घरे पुन्हा बांधता,
रोज नवा बाजार मांडता,
आम्ही तुलाच पाहिले,
रोज ऊठता बसता,

दुखःदायी जाळ्यांमध्ये,
हारातल्या कळ्यांमध्ये,
आम्ही तुलाच पाहिले,
पाप आणि पुण्यामध्ये,

पाथरवटाच्या चिऱ्यात,
खाटकाच्या सुऱ्यात,
आम्ही तुलाच पाहिले,
जिवनिर्जीव चराचरात.

प्रेमात पडताना

Share

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही...

का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण...

मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही...

रात्री छान च असतात ... तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी ... मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला...

प्रेम कधी सफल होते तर कधी नाही... ते जीवनात कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असत...

प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही ...
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही...

"शेवटची ईच्छा"

Share

"शेवटची ईच्छा"

तिच्या बाहुपाशात मला आहे सामायचं
जगुन झाल्यावर पुन्हा एकदा, तिच्यासमवेत जगायचं,
आकाशाच्या खिडक्यांतुन, खाली डोकावुन पहायचंय
मृत्यु समोर येताच, त्याला आहे बिलगायचं

निरोप घेऊनी शेवटचा, दूर निघुनी जायचंय
जीवनातील सुख-दुःखांना, पृथ्विवरच विसरायचं,
मृत्युच्या रम्यनगरीत, मला आहे हरवायचं
"तो" समोर येताच, त्याला आहे बिलगायचं

मी निघून गेल्यावर मात्र, कोणी नाही रडायचं
पीडा दूर झाली म्हणून, मनसोक्त हसायचं,
आठवण आल्यास माझी, हळुच आकाशाकडे पहायचं
मरण समोर येताच, त्याला आहे बिलगायचं

पण मलाही अजून, थोडं जीवन जगायचयं
सुख कुठे असतं का, हे नीट तपासायचयं
ज्याला मी हवा असेन, असं मन शोधायचयं
मृत्यु समोर येताच, त्याला थोडा वेळ थांबवायचयं..... त्याला थोडा वेळ थांबवायचयं....

गजबजतो एकान्त

Share

गजबजतो एकान्त

्तिला पाहून एकदा
झालो वेडा ्मी बेफ़ाम
गजबजला एकान्त
मनी तोडून लगाम

तिच्यासोबत सन्सार
थाटण्याचा मनसूबा
बान्धू लागलो मनात
जरी स्टॊपवरी उभा

वाटे सान्गावे जावून
तिला घेवून बाजूला
डोळ्यामधे साठवावा
तिचा चेहेरा तजेला

मग हातामधे घ्यावा
तिचा नाजूकसा हात
रन्गवावी प्रेम स्वप्ने
तिच्या प्रेम-महालात

धीर करून एकदा
गेलो गुलाब घेवून
उभी होती पाठमोरी
आज शाल लपेटून

तिच्या डोळ्यात पाहून
माझे मन केले रिते
डोळ्यामधे मात्र तिच्या
दोन थेम्ब उभे होते

तशी गेली ती निघून
एक शब्द न बोलता
आले आभाळ भरून
डोळी पाऊस दाटला

तिला जाताना पाहून
मन होई ना हे शान्त
मनी प्रश्न प्रश्न प्रश्न
पून्हा ओरडे एकान्त

मागाहून मग मला
सखी तिची समजावी
वाचा बालपणी तिची
का ही देवाघरी जावी??

आज रोज पहातो मी
तिच्या उत्तराची वाट
रोज एकला राहतॊ
गजबजतो एकान्त......

कोण जाणे मी कुणाला का कधी पसंत नाही?

Share

कोण जाणे मी कुणाला का कधी पसंत नाही?
नापसंतीची त्यांच्या मजला कधी खंत नाही ||१||

बोलतो मी अर्वाच्य नुसते सारेच हे म्हणती असे
अभंग बोलण्यास मग मीही टाळकुट्या संत नाही ||२||

बोलणे माझेच का काट्यापरी खुपे त्यांना?
फुलापरी बोलायाला बहराचा मी वसंत नाही ||३||

थांबता का मजसाठी? कितीदा पुसावे त्यांना
थांबण्यासाठी इथे पण कुणालाच उसंत नाही ||४||

चालणे मलाच आता कठीण वाटू लागले
आपोआप चालण्या मी ज्ञानियाची भिंत नाही ||५||

जिंकीवी ह्रदये सारी गोड लटके बोलुनी
गोडीत गळा कापण्याचा हा माझा पंथ नाही ||६||

चारोळी

Share

रंग आणि रूप पाहून प्रेम कधीच करू नये,
मानाने जडलेल प्रेम च खरे प्रेम असते,
पण हे फक्त चारोळित च वाचायला छान वाटते,
कारण ह्या जगात मनापेषा रंग आणि रूप नेहमीच वरचढ ठरते......

******************************

रंग रूप बदलत जातात
बदलत जातात माणसांची आवर्तनं
खरं प्रेम बदलत नाही
बदलतात ती निव्वल आकर्षणं

******************************


चारोळी

Share

सावली मिळते तेंव्हा जाणवत ,
उन्हाची काय तलखी असते ,
तुफान गर्दीतही जाणवत ,
की आपली एकांडीच एक पालखी असते .

******************************

कुणी एकाकी ना निघून जावे
येईल त्याला सोबत न्यावे
उन्हात ही, चालेल रस्ता पुढे
आपण त्याच्या पाठी चालावे

******************************

चालता चालता अडखळलो
यात मला दोष कशाला ?
जाणतो, कुणी पेरले दगड रस्त्यात
आपल्याच माणसावर रोष कशाला ?

******************************

येईल त्याला सोबत घेणे,
मनाला काही पटत नाही ,
अनामिक भीतीचा पगडा ,
काही केल्या सुटत नाही...

******************************

अग एकटी गेलीस तर
ख़रच एकटी पडशील
एकांतात कुणाच्या खांद्यावर
डोकं ठेवून रडशील ?

******************************

पावल नेहमी जपून टाकावी,
ठेच लागली ,तर शहाणा व्हाव ,
दिसत नसेल रस्ता साफ़ ,
तर चश्मा पुसून पहाण व्हाव .....

******************************

रस्ता पाहनं होतच नाही
तू समोर दिसलीस की
चश्मा पुसनं होतच नाही
तू सोबत बसलीस की

******************************

तू समोर असली की तूझी
आठवन काढत बसतो
तू दूर गेलीस की तुझ्या
आठवणी साठवत बसतो

******************************

एखादा पदार्थ बिघडला ,
की दुरुस्त नाही करता येत,
अगदी जिवलग मैत्रिनिनी केला असेल तरी,
डोले मिटून फस्त नाही करता येत...!!

******************************

सगली सुखं
तिच्याबरोबर वाटून घेइन
विष जरी दिले मला
ते ही डोळे मिटून घेइन

******************************

विष पचवलस,तर नीलकंठ होशील,
आवडेल का ते तिला ?
शोभून दिसेल का रे ते
तिच्या गोर्या रंगाला ?

******************************

शब्दाविणा कविता अवतरली

Share

शब्दाविणा कविता अवतरली

.
तू
अलगद
हात
धरलास

नि
खांद्यावर भार टाकलास

तू
सावरलसं तुझ्या केसांना

पण
चेहरा माझा झाकलास

तू
अलगद
हात
धरलास

स्वप्नांचा मी राजा झालो

ह्या
धगधगीच्या जिवना पासून

काही
क्षण
वजा
झालो

तू
अलगद
हात
धरलास

एक
वेदना काळजात शिरली

मी
काही
बोलणार इतक्यात

शब्दाविणा कविता अवतरली

तू
अलगद
हात
धरलास

स्पर्शात मी मिसळून गेलो

चिखलात रुतलेला मी कमळ

देव
चरणांच्या जवळून गेलो

तू
अलगद
हात
धरलास

मी
झेलल्या चांदण्यांच्या गारा

तू
रेषां मध्ये हरवलीस

मी
रचला
भविष्य सारा

तू
अलगद
हात
धरलास

मी
कल्पनेत बुडत गेलो

माझ्या वास्तवाची झालीस सावली

मी
काट्यां मध्ये बागडत गेलो

तू
अलगद
हात
धरलास

काय
बोलावे तेच सुचेना

भावनांचा अख्खा गाव गिळताना

शब्दाचा एकही अंकूर फुटेना

तू
अलगद
हात
धरलास , नि

माझ्या डोळ्यांत हरवून गेलीस

इवलसं घर कुठे बांधायच आहे

तू
डोळ्यात वास्तू ठरवून गेलीस

तू
अलगद
हात
धरलास ,

नि
बोटं
गुंफवलीस बोटात

मनात
माझीच मिरवणूक निघाली

वाजत ,
गाजत
थाटात

तू
अलगद
हात
धरलास , नि

मुक्यानेच मागून गेलीस

हृदयाला स्पर्श करून , का गं

परक्या सारखी वागून गेलीस

तू
अलगद
हात
धरलास , नि

काळजाचा ठोका चुकला माझा

वर
म्हणालीस , “ तुला काहीच नाही कळत ”

अस
का
वागतोस तू राजा

तू
अलगद
हात
धरलास

मी
त्या
क्षणांचा होत गेलो

तू
नसताना जवळी

तुझ्या स्वप्नांचा होत गेलो

तू
अलगद
हात
धरलास

मी
संथ
निथळत वाहणार

तुझ्यात इतका मिसळल्यावर

माझ्याकडे कसा मी राहणार

तू
अलगद
हात
धरलास

मी
श्वास रोखून धरला

पुढचा श्वास मी

तुझ्या श्वासाने भरला

तू
अलगद
हात
धरलास

मी
रंगात भिजून गेलो

आभाळ
कवेत
घेऊन

मी
इंद्रधनूत निजून गेलो

तू
अलगद
हात
धरलास

देह
माझा
जरा
थरथरला

कसा
व कधी , कळलचं नाही

हर्शाचा थवा मनी उतरला

आयुष्य कसं असतं

Share

मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?

पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्‍या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्‍याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?

पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्‍याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्‍याला फुलविण्याचा
दुसर्‍याला आनंद देण्याचा

शनिवार, २५ एप्रिल, २००९

चारोळी

Share

हृदयाला तर
लागलेत तडे जाऊ
आता का ते फुटण्याचीही
वाट पाहू??

******************************

आधी वाटलेल तिच्या
रुपात देव भेटलाय
आता वाटतय
राक्षसाने जन्म घेतलेला

******************************

माझ ह्रदय तर
तुला देऊन टाकले कधीच ....
मला परत दे
तुला त्याचे तुकडे खुपन्या आधीच ....

******************************

आज समजुन येतेय चुक
ह्रदय देताना किती
झाली असावी
तुझ्या मनाची धाकधूक

******************************

तुला फ़क्त धाकधूक जाणवली
पण हे कुठं तुला माहित कि
प्रेमात पडताना
हर एक जाणीव सुखावली

******************************

प्रेमात पडल की दुसर्या गोष्टी सुचत नाहीत ,
जाणिवे-नेणिवे चे कंगोरे टोचत नाहीत ,
सुखाची शाल पांघर्लेली असताना ,
नको त्या आठवणी रुचत नाहीत .

******************************

प्रेम तूटल्यावर मात्र सर्व गोष्टी आठवतात,
जाणीव-नेनिवचे कंगोरे टोचतात,
दु:खाची शाल पांघराली जाते,
आणि फक्त आठवणी बोचत राहतात.........

******************************

चारोळी

Share

चंदनाचा धर्मं झिजन्याचा
मी कधी नाही नाकारला
गुलाब सुद्धा मी नेहमी
काट्यांसाहित स्वीकारला

******************************

चंदनाने झिजावे ,
गुलाबाने रिझावे ,
हे त्यांचे कामच आहे,
काट्यावर चालून न विव्हलता,
पुढे जाणे,हा मानवाचा धर्म आहे.

******************************

निघून जाइल पायात रुतलेला काटा
जखम ही भरून जाईल
पण मनाचं जर रुतला काटा
तर मी मरून जाईल

******************************

मरनाच काय घेउन बसलास,
लोक रोज थोड थोड मरतच असतात .
आयुष्य दिले देवाने जगण्यासाठी ,
पण मरणाच्या आशन्केन डरतच असतात !

******************************

पायातल्या काट्याने
फ़क्त पाय दुखावतो
मनातल्या काट्याने
पूर्ण माणूस विव्हळतो

******************************

आयुष्य जर देव
देतो जगण्यासाठी
तर का ह्रदय तडपडत
तिच्या जाण्यानी

******************************

रोजच्या मरन्यापेक्षा
एकदा मेलेलं बरं
आयुष्यातून उठण्या अगोदर
आयुष्यातून गेलेलं बरं

******************************

प्रेम करणार तू
अन त्रास मनाला
दगा देणार ती
अन दोष देवाला

******************************

ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,
फुटले तर नाही ?
आयुष्याचे रंग ,
विटले तर नाही ?

चारोळी

Share

त्याग करून तू
स्वताचा मोठेपणा जपलास
माझ्या प्रीतिचा
मात्र अवमान करून गेलास

*********************************

सात समुद्र अथांग,
तुज्या अणि माज्या मधे..
तरीही तुजा प्रत्येक श्वास
दरवलाला माज्या मना मधे॥
----------------------------
सात समुद्र जरी असले
तुझ्या माझ्या मधे
तरी एकमेकांच्या मनात आपण
सांग अन्तर उरले कुठे

*********************************

स्वत्व देवू शकले नही तुला,
माझे श्वास अर्पिले तुला ...
तुझे आयुष्य फुलण्यासाठी ,
माझा श्वासोश्वास झाला ..
--------------------------
स्वत्व नको मला
तुझा फक्त श्वास पुरे
तुझ्या आठवणींत
माझा उर पाझरे

*********************************
त्याग करून तू
स्वताचा मोठेपणा जपलास
माझ्या प्रीतिचा
मात्र अवमान करून गेलास
----------------------------------------


त्याग करून मी माझा
मोठेपणा दाखवत नव्हतो
तर तुझ्या श्वासांची माझ्यासाठी
असलेली किंमत दाखवत होतो

*********************************

सात समुद्र अथांग,
तुज्या अणि माज्या मधे..
तरीही तुजा प्रत्येक श्वास
दरवलाला माज्या मना मधे॥
---------------------------
समुद्र जरी अथांग असला तरी
मनाची त्याला कशी सर
विहंग होवून आकाशी उडे
क्षणांत कापे लाखों अंतर

*********************************

तुझा श्वास माझ्यात हरवतो
तुझ्या मनात माझा गंध दरवळतो
फक्त तुला म्हणून सांगते
माझा ही जीव तुज्यात अडकतो

*********************************

प्राणवायु विना तू,
क्षण क्षण विझत गेलास ..
प्रेम उधालित माझ्या वरती
चंदनासम झिजत गेलास ..
===============
चंदनासम झिजले तरी
सुवास माझा कुठे दरवळला
काळसर्पाने मात्र आपल्या
प्रेमावर घाला घातला

*********************************

स्वत्व देवू शकले नही तुला,
माझे श्वास अर्पिले तुला ...
तुझे आयुष्य फुलण्यासाठी ,
माझा श्वासोश्वास झाला ..
--------------------------
स्वत्व नको मला
तुझा फक्त श्वास पुरे
तुझ्या आठवणींत
माझा उर पाझरे
=========
स्वत्व नको मला
तुझा फक्त श्वास पुरे
तुझा माझ्यावर असलेला
थोडासा विश्वास पुरे

*********************************

आयुष्य माझे फुलण्यासाठी
तुझा श्वासोश्वास झाला
तुझ्यासाठी तर मी
हवेतला प्राणवायूही त्यागला
==============
तुझ्या त्यागाचे
काय वर्णू मी मोल्..
महान ठरल्या सर्व
तुझ्या भावना अबोल.....

*********************************

प्राणवायु विना तू,
क्षण क्षण विझत गेलास ..
प्रेम उधालित माझ्या वरती
चंदनासम झिजत गेलास ..
===============
चंदनासम झिजले तरी
सुवास माझा कुठे दरवळला
काळसर्पाने मात्र आपल्या
प्रेमावर घाला घातला
============
चंदनासम झिजले तरी
सुवास माझा कुठे दरवळला
तुझ्या विरहाच्या जाणीवेने
श्वास माझा कोंडला

*********************************

प्राणवायु विना तू,
क्षण क्षण विझत गेलास ..
प्रेम उधालित माझ्या वरती
चंदनासम झिजत गेलास ..
---------------------------------------
मी झिजतोय ह्याचे
नव्हते मज भय
तू जगत्येस हीच भावना
होती सुखावह

*********************************

चारोळी

Share

लाईट बिल तर मी
नेहमी भरतो
तू तर केवळ
वीजचोरीचा मार्ग अवलंबतो

******************************

पर्वत म्हणजे तरी काय
असते ते एक वॄक्षांचे ताटवे
कुणी वॄक्ष मोठे तर
कुणी रोपटे छोटे

******************************

वृक्षावर उगवतात
केवळ फळ आणि फूले
ही सर्वच आहेत ना
पर्वताची मुले

******************************

इथे छोटं असण्याचे
फायदे बरेच आहेत
मोठयांच्या जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत

******************************

छोटे मोठे असा वाद नाही
मोठ्यांना ही छोट्यांकडून
शिकता येते हयात
माझी काही शंका नाही

******************************

माझा श्वास तर केवळ
तुझ्या मनात दरवळतो
मी तर तू दिलेल्या
श्वासातूनच जीवन जगतो

******************************

आयुष्य माझे फुलण्यासाठी
तुझा श्वासोश्वास झाला
तुझ्यासाठी तर मी
हवेतला प्राणवायूही त्यागला

******************************

मराठी

Share

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

प्रिय अतिरेक्क्यानो............ ......... ...

Share

मारून मारून मारल किती ?
हा १२५ कोटि चा देश आहे
तावुन-सुलाखून निघालो आम्ही
एकात्मता अजूनही शेष आहे

जिंक्ल्याची नशा चढेल ,
हा क्षण चा भास् आहे
१५० वर्षाचा लड़न्याचा
पाठीशी आमच्या इतिहास आहे

लपून-छापून लढता तुम्ही
औलाद तर भित्रयांची आहे
दिसली जी झलक आम्हाला
ती पागल कुत्र्याची आहे

कधी हिरवा,कधी भगवा
ही तुमची धार्मिक ढाल असते
वाहिले जाते जे रक्त सरे
ते तर फ़क्त लाल असते

तसे तुमचे नापाक इरादे ही
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत
तिरंग्याची शपत आहे ,
आम्ही उगाचच बकत नाहीत

नाक उचलून बोलतो आम्ही
तुमच्या प्रमाने नकटे नाहीत
राहिल जग पाठीशी आमच्या
आम्ही काही एकटे नाहीत

आमच्या अभंगतेच्या कथा
तुम्हास कलुन चुकल्या आहेत
झाडल्या गोल्या ,फोडले बोंम्ब
तय आमच्यासाठी टिकल्या आहेत

हा गैरसमज कडून टाका
तुम्ही आम्हाला गुलाम करताल!
तुम्हीच `भारत माता की जय म्हाणित
तिरंग्याला सलाम करताल !!
जय भारत........ जय महाराष्ट्र......

जय जय महाराष्ट्र माझा

Share

जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

हृदय फेकले तुझ्या दिशेने

Share

हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌


हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌


गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर


मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही

!! जय भवानी !! जय शिवाजी !!

Share

इन्द्र जीमी जंभपर, वाढव सुअंभ पर,
रावण सदम्भ पर, रघुकुल राज है |

पौन बारीबाह पर, संतु रतीनाह पर,
ज्यो सहसत्रबाह पर, राम द्वीजराज है |

हृदयात माउली रयतेस साउली गड कोट राउळी शिवशंकर हा
मुक्तीची मंत्रणा युक्तिची यंत्रणा गड दुष्ट दुर्जना खलयंतर हा
संतास रक्षितो शत्रुन्सी खंदतो भावंड भावना संस्थापितो
नैसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभुपतो

दावा दृमदंड पर, चीता मृगझुंड पर,
भूषण बितुंड पर, जैसे मृगराज है |

तेज तम अंस पर, कान्हा जीमी कंस पर,
त्यों मलेच्छ वंश पर, शेर शिवराज है |

फक्त तुझ्याचसाठी ..........

Share


फक्त तुझ्याचसाठी ..........
आयुष्यातले प्रत्येक क्षण
मोजत असता मला हळूच चाहूल लागून जाते
एक सावली पडून जाते
थंड वारा वाहवून जाते




तेव्हापासून सारखी मी वाट पाहते
त्या सावलीची ती चाहूल
त्या थंड वाऱ्याच्या झोक्याची
नजरेसमोर येणारया त्या व्यक्तिच्या प्रतिबिंबाची




तेव्हा पासून मन माझे
मला सांगत असते
वाट पाहायची त्याच्यासाठी
वाट पाहयची त्या सावलीसाठी


कधीतरी ती व्यक्ति समोर येते
मनाला आनंदाचा अस्वाद देते
त्याच्या फक्त गोड शब्दांमधून
अनेक गोडवे जाणवतात


तेव्हा माझे मन स्वत: ठरवते
सर्व काही मिळवीन फक्त तुझ्यासाठी
सर्वकाही सोसीन फक्त तुझ्यासाठी
आयुष्यातला प्रत्येक क्षण देईन फक्त तुझ्यासाठी




आयुष्यातील सर्व दु:ख
गोळीसारखी एकाच वेळी गिळून टाकीन
डोळ्यातले अश्रु न थांबल्यास तुझे चित्र पाहीन
अन ते डोळे मिटिन


मला असेच वाटते ....
आयुष्य जगावे हे तुझ्याचसाठी
सर्व काही संपवावे फक्त तुझ्याचसाठी
प्रत्येक क्षण सोनेरी बनवावा फक्त तुझ्याच साठी
हे ह्र्दय काढून द्यावे फक्त तुझ्याच साठी

.

पहिली रात्र

Share

जवळ ये सखे अशी
हातात हात गुंफू दे
नाजूक स्पर्शफुले उमलत
ही रात्र अशीच सरु दे.

डोळ्यांत तुझ्या त्या गहिर्‍या
खोल खोल मज हरवू दे
चिरस्मृती मनातील उजळत
ही रात्र अशीच सरु दे.

एकांतातल्या सहवासात या
मुकया क्षणानां बहरू दे
लज्जेची लाली तुझ्या गालांवर पसरत
ही रात्र अशीच सरु दे.

चूरगळलेला गजरा तुझा
मिलन-गोष्ट आपुली सांगू दे
सुगंध-सलाम रातराणीचा घेत
ही रात्र अशीच सरु दे.

सखे, आठवते तुला?

Share

सखे, आठवते तुला?
अशाच ढगाळ संध्याकाळी...

दाट फुलून आलेल्या गुलमोहरखाली
हातात हात घेऊन आपले बसणे...

"हवेत जरा गारवा आहे" असे म्हणत
हळूच तुझे मला बिलगणे...

तुझे भूरभूरणारे केस
माझ्या थरथरत्या हाताने सावरणे...

पावसाची पर्वा न करता
तसेच चिंब भिजणे...

निरोप घेताना
डोळ्यांचे ते पाणावणे...

गालांवरून ओघळणार्‍या मोत्यांचे
पावसाच्या पाण्यात विरघळणे ...

आणि पुन:पुन्हा मागे वळून बघत
पाय ओढत घरी जाणे...

..सखे, आठवते तुला?

... म्हणे कधीतरी काहीतरी लिहीत जा

Share

दूर देशात
अनोळखी वाटात
सूर माझा गवसेना
... म्हणे कधीतरी काहीतरी लिहीत जा

मिणमिणत्या चांदण्यात
चंद्र शोधताना
स्वप्नातही मी हरवलेला
... म्हणे कधीतरी काहीतरी लिहीत जा

अक्षराला अक्षर अन्
शब्दाला शब्द जोडताना
अर्थच कुठेतरी भरकटलेला
... म्हणे कधीतरी काहीतरी लिहीत जा.

... पण शब्दच होते

Share

भले शब्द होते बुरे शब्द होते
संतांचे अभंग
अन् तमाशातली लावणी होते
कधी भक्तिरसाने ओथम्बलेले
तर विषयासक्त कधी होते.

भले शब्द होते बुरे शब्द होते
मनाचे श्लोक
अन् गीत-रामायण होते
कधी सज्जनांचे आचरण
तर अगतिकता सीतेची कधी होते

भले शब्द होते बुरे शब्द होते
ऊस्फुर्त काव्य
अन् सुरेल गीत होते
कधी कल्पनेपलिकडले
तर जुळवलेले यमक कधी होते

भले शब्द होते बुरे शब्द होते
श्रीमदभगवदगीता
अन् पुराणातले वेद होते
कधी ब्रम्हान्डदर्शन
तर युगांचे अत्याचार कधी होते

भले शब्द होते बुरे शब्द होते
जन्मो-जन्मीची गाठ
अन् जन्मान्तरही होते
कधी मंगलाष्टके
तर कधी तेराव्याचे विधी होते

भले शब्द होते बुरे शब्द होते
पण ...
शब्दच होते.

लहान(?) मुलांसाठी गोष्ट

Share

वय वर्षे - अडूसष्ट
नातवाला सांगतो - गोष्ट

गोष्टीतली राजकुमारी - शिष्ट
तिच्यावर आले - अरिष्ट

झाले तिला - कुष्ठ
राजा झाला - क्रोधिष्ठ

बोलावले वैद्यराज - ज्येष्ठ
त्यांचे औषध - श्रेष्ठ

औषधाची चालेना - मात्रा
राजाने केली - यात्रा
वाटेत लागली - जत्रा

जत्रेत होते - कुत्रे
लेवुन भरजरी - वस्त्रे
तोंडपाठ त्याला - शास्त्रे

दोघे खेळले - सारीपाट
बुद्धिमत्ता कुत्र्याची - अफाट
राजा झाला - अचाट

कुत्र्याला घातले - साकडे
करीन सोन्याचे - तबकडे
कुरवाळले शेपूट - वाकडे

कुत्रा म्हणाला .... घुरर घुरर

अरेच्चा??

बाळा, ऐकतो आहेस ना?
झोपलास? बर, उरलेली गोष्ट उद्या!

देहदानाचा धंदा

Share

सोयर-सुतक मला न कसले
न सापडते गर्तेत भावनांच्या
देहाची गरज केवळ जाणते
धंद्यात मी देहदानाच्या

भर बाजारी दुकान थाटते
बोली लावते कवड्यांच्या
संभोग-वेदीवर हवनासाठी
समिधा विकते यौवनाच्या

नववधुसारखी लाजते
शृंगारात मी विकतच्या
जाणतेपणी हरखते
सौभाग्यात मी प्रहरभराच्या

खंत नाही खेदही कसले
शोधात क्षणभर सुखाच्या
चार पायर्‍या जास्त चढले
तुलनेत मी द्रौपदीच्या

पंगतीवर पंगती उठविते
आसुसणार्‍या भुकेल्या शरीरांच्या
देहदानाचे पुण्य माझे
खजिन्यालाही लाजवील कुबेराच्या.

शुक्रवार, २४ एप्रिल, २००९

चारोळी

Share

लाईट बिल तर मी
नेहमी भरतो
तू तर केवळ
वीजचोरीचा मार्ग अवलंबतो

******************************

पर्वत म्हणजे तरी काय
असते ते एक वॄक्षांचे ताटवे
कुणी वॄक्ष मोठे तर
कुणी रोपटे छोटे

******************************

वृक्षावर उगवतात
केवळ फळ आणि फूले
ही सर्वच आहेत ना
पर्वताची मुले

******************************

इथे छोटं असण्याचे
फायदे बरेच आहेत
मोठयांच्या जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत

******************************

छोटे मोठे असा वाद नाही
मोठ्यांना ही छोट्यांकडून
शिकता येते हयात
माझी काही शंका नाही

******************************

माझा श्वास तर केवळ
तुझ्या मनात दरवळतो
मी तर तू दिलेल्या
श्वासातूनच जीवन जगतो

******************************

आयुष्य माझे फुलण्यासाठी
तुझा श्वासोश्वास झाला
तुझ्यासाठी तर मी
हवेतला प्राणवायूही त्यागला


चारोळी

Share

जगात या आपलंच मानुस
उभं राहतं आपल्या पाठी
कुणी सुद्धा येत नाही दुसरं
गाठल्यावर पन्नाशी साठी

******************************

स्त्रीचे आयुष्य जणू
मेणबत्तीसारखे असते
सम्पूर्ण घराला दिपवण्या
एकटीच रडत उभी राहते

******************************

स्त्रीचे आयुष्य जणू
मेणबत्तीसारखे असते
हो पण मेणबत्ती वर लक्ष्य नाही दिलं तर
सारे घर पेटून बसते

******************************

मेणबत्तीच काम
प्रकाश देणे
आपल काम तिला
विझू न देणे

******************************

मेणबत्ती नव्हे,समई असते स्त्री,
देवघरात अखंड तेवणारी,
घराच घरपण जपणारी ,
नाती अबाधित ठेवणारी ....!!

******************************

मेनाबत्तिशी खेळणं
बंद कर
पहीले जाऊन
लाइट बिल भर

******************************

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असत
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे
म्हणूनच खड़क झिजतात
प्रवाह रूंदावतो

******************************

कुणी काय म्हणते
ते जाऊद्या
तुम्ही काय म्हणता
ते मला पाहु दया

******************************

त्यांच्या शब्दात दडले
होते किती महत्त्व
पर्वतासमोर नसते काही
रोपटयाचे अस्तित्व

******************************

पण पर्वतानेही लेखु नये कमी
रोपटयाला कधी ही
कुणाची ही जागा
घेऊ शकत नाही कुणी ही

******************************

पर्वत कधी लेखत नाही
रोपटयाला कमी
वादळ आले तरी संरक्षण करीन
ह्याची देतो हमी

******************************

पर्वताकडून रोपटयाला
आहे खूप काही शिकण्यासारखे
कितीही वारा सुटला तरीही
न डग मगायचे

******************************

रोपते असते निरागस
त्याला नसे वादळाचे भय
नकळत तुडवल्यावर कोमेजेल
असे नाजुक त्याचे वय

******************************

रोपटयाने आधी वाढून
बनाव वृक्ष
मग पाहता येईल
उभा रहू शकतो का तो पर्वतासमक्ष

******************************

चारोळी

Share

आगीची धग अंगाची
लाही करुन जाते
पाण्याची शीतलता
त्याला करवाळून जाते

******************************

सर्व काही विसरून
जर प्रेमात पडायच
नंतर मग आठवण
काढून का रडायच

******************************

प्रेमाची सुरुवात तर
खूप जोरात करता
नंतर मात्र स्वतःच
दुखाच्या खाईत लोटता

******************************

premat tar sara sagar gothato........
dukhachya khaitahi anadacha sagar bhetato........

******************************

वेळ हे प्रत्येक दुखण्याच
औषध जालिम
त्याच्या पुढे निष्फळ
ठरले नामी हकिम

******************************

मनात लागलेली
आग विझत नसते
थेंब तर सोड त्यास
जलाशय ही अपुरे पड़ते

******************************

प्रेमाला सुरुवात अन
शेवट कुठे असतो
ह्या दोन अक्षरात
सगळ जग सामावत

******************************

are vedya premat kadhich aag lagat naste........!
ti tar dishya vedya pravasyala disha dakhavnari mashal aste.......!

******************************

सागर गोठला तरी
एक दिवस तोही वितळेल
धीर् धर वेड्या एक दिवस
दगडलाही पाझर फुटेल

******************************

प्रेमात जर आग
लागत नसते तर
मशाल हाती घेउन ही
जगण्याची दिशा का सापडत नसते

******************************

मनात लागलेल्या आगीला
कश्या शांत करतील जलधारा
त्या साठी गरज असते फक्त
प्रेमिकेच्या प्रेमाचा नझराणा

******************************

प्रेमात जर
शेवट नसतो
अलिप्त होताच
प्रेमी अश्रु का ढाळतो

******************************

अश्रूसुध्दा प्रेमाच्या अस्तित्वाची
ग्वाही देत असतो
म्हणूनच प्रेम गेल्यावरच
डोळ्यातून वाहत असतो

******************************

ashru jari dhalale tari prem sampat nahi.......!
uun kitihi vathala tari samudra atat nahi..........!

******************************

प्रेम कधी ही आटत नसत
प्रेमी नजरेआड गेला तर
आपल्या मनात खोलवर
कुठेतरी दडत

******************************

lok prem manat dadun ka thevtat.........
dusarychya samadhansathi swatahchya bhavna ka thechtat

******************************

दुसर्यांसाठी भावना लपव्ण्यात्
ही समाधान असते
जरी हवे ते नसेल पण
लोकंचे आशिर्वाद मिळवून देते

******************************

मी ही तुझ्या साठीच्या भावना लपवूनच ठेवल्या
म्हटले तू कधीतरी समजशील..
आणि आता मला ते प्रेम क्षितिजासारख वाटायला लागलय ..
फार सुन्दर पर वास्तव्यात नसलेले.

******************************

चारोळी

Share

सुटु दे मोकाट तुझ्याही मनाला
उगाच का आवरायच त्याला
कधी एखादा अविष्कार ही घडवेल
सांगता येइल कुणाला

----------------------------------

मनाला ही कधीकधी
आवर घालावा लागतो
गोड खाता खाता तिखटाचाही
स्वाद घ्यावा लागतो

*********************

दिवसभर सूर्य
धरतीला जाळतो
रात्री मात्र स्वतः
आकाशाआड़ जाउन लपतो

*********************

मनाला आवर जरूर घालावा
पण
लहान मुलासारख
स्वछंदी बागडून ही द्यावा..

*********************

रात्री सुर्याची
जागा चंद्र घेतो
अन् मग सुर्य परत
मिलनास आतुरतो

*********************

बागडता बागडता
मन धडपडत
ठेच लागता मात्र
जवळ कुणी नसत

*********************

सूर्य जर जमिनीवर
इतक प्रेम करतो
मग दिनभर समोर राहूनही
तिला का जाळतो

*********************

jivant nehami dusryavar avalambun rahaych nasta............!
vel kahi sangun yet nahi .
mhanun sawtahanech swatahal sambhalaych asta..........

*********************

वेड्या जवळ कुणी नसल तरी
देव सगळ बघतो
म्हणूनच अगदी वेळेवर तो
दुताला धाडतो

*********************

ह्या जळण्यात ही
असतो एक गोडवा
तुला काय मला काय
सर्वांनाच हवा

*********************

dusryala madat karanyasathi jar dev dutala dhadato ..........................
tar mag swataha sankatat sapdlyavar konachi madat gheto..........

*********************

स्वतः स्वतला किति रे सम्भळणार
मन ही कंटाळत
म्हणूनच कोणी तरी
आपल्याला सांभाळणार लागत

*********************

देव जर सर्व
पाहत असतो
मग सर्व नष्ट झाल्यावर
दूत का धाडतो

*********************

संकट निर्माण करणार तोच
हरणरा तोच
त्यची मदत आपण काय करणार
स्वताला तारणारा तोच्

*********************

जळण्यात जर
असतो गोडवा
आग लागल्यावर का मारतात
मग पाण्याचा फवारा

*********************

jagane takun dilelyalvar sambhalun kon ghenar..................
ujad walvantat adklelyala pani kon denar.............

*********************

आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव
करवायचा त्याच्याकडे हाच् उपाय
जर सगळ नीट केल तर
त्याची आठ्वण राहील काय

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

चारोळी

Share

तु दिसल्यावर तुझ्यापासुन लांब
जावेसे वाटत नाही....
पण लांब जायलासुद्धा तु
जवळ येत नाहिस

***************

मी दाखवत नाही म्हणून
तुला माझ प्रेम कळत नाही...
आणि कळत असलं तरी..
तुही ते दाखवायचा प्रयत्न करत नाही...

*********************

अग जवळ लांबचं काय घेउन बसतेस,
तू डोळ्यात राहतेस अन मनात वसतेस
आणखी बोलायला कशाला हवं

*******************

डोळ्यांचं भाषांतर कलायला हवं
डोळ्यांची भाषा कळत नाही...
अन शब्दही अपुरे पडतात....
तुझ्या जवळ याव म्हटल .....
तर पावलही अडखळतात......

*******************

शब्दात नाही जमत तर
कोरं पत्र पाठवून दे
तू नाही आलीस तरी चालेल
तुझं मनं त्यात पाठवून दे

*******************

मन तर माझ मी
केव्हाच तुला दिलय
हृदयावर ही केवळ
तुझच नाव लिहीलय

*******************

अरे मन दिलं हे
मनात ठेवायचा नसतं
एकदा तरी ते
ओठावर आणायच असतं

*******************

डोळ्यांनी भाषांतर करतोस
ओठांवर भावना आणण्यास सांगतोस
पण स्वतः मात्र प्रत्यक्ष येउन
बोलायला किती घाबरतोस

*******************

प्रत्यक्ष येउन बोलायला
माझी हरकत कधीच नाही
पण मी जाणतो, जो प्रेमात पडतो
तो सावरत कधीच नाही

*******************

अरे प्रेमात धडपडायला
होत नसते तर प्रेमच
धडपडत्या मनास
सावरत असते

*******************

प्रेमात धडपड होण्याची
इतकी भीती बाळगतोस
मग रोज समोर येउन
डोळ्यांची भाषा तरी का बोलतोस?

*******************

ज्याला धड चलता येत नाही
तो प्रेमात काय पडणार
असलं पांगळ प्रेम
आपल्याला नाही परवडणार
*******************
मी प्रेमात पडलो, प्रेमात रडलो
म्हणुन प्रेमाला भीतो
दुधाने जळालेला
ताक पण फुंकून पितो

*******************

premala bhito,to kasla premi?
prem karnaryane needar asava nehmi,
prem hi ek sundar bhavna aahe,
prem hi hridayachi samvedana aahe.

*******************
ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला, आजवर माहितीये
ओठावर ठेवतो खोटं हसू
खुप दुखतं खोलवर माहितीये

*******************

प्रेमात लाभलेल्या अश्रुंना ही
वेगळे महत्त्व असते
त्यातूनच तर नंतर
प्रेमाची खरी जाण कळते

*******************

ट्रेन मधून तिच्या बरोबर
जाण्यात अर्थ आहे
प्लेटफोर्म वर उभा राहून
टाटा करणं व्यर्थ आहे

*******************

jichyavar prem karto,
ti vyakti dukhavu shakate,
pan khudda prem itke sundar asate,
je vedananna sukhavu shakte.

*******************

प्रेम तिनं करू नये जिला
मझ्या भावना कळत नाही
शुन्य गुंतवणकीवर कधी
परतफेड मिळत नाही

*******************

प्रेम हे वेड्या तराजूत
नाहीत रे तोलत
खरे प्रेमी प्रेमाच्या बदल्यात
प्रेमाची अपेक्षा नाहीत रे करत

*******************

अपेक्षा नाही करत मी
मान्य, प्रेमात ही वाद हवा
पण दोन हाकांना किमान
एक तरी प्रतिसाद हवा

*******************

अपेक्षा नाही केलीस पण मग ठाम मागणी ही केली नाहीस
हाक मारलीस तीही मी दूर गेल्यानंतर..
तुला सतवनारा प्रश्न माझ्या प्रतिसादाचा होता
की तुझेच प्रेम असन्या-नसन्याचा?

*******************

जे आपल असत ते काय् मागयच
सरळ द्यायच अन् घ्यायच
प्रेम करतेस म्हणतेस...
पण एवढ तरी कुठं तुला कळत......

*******************

प्रतिसाद द्यायला
माझी साद तरी ऐकलीस का सखे....
अग् जाता जाता
एकदा तरी मागे वळून बघितलस कुठे.....

*******************

प्रश्न तर माझे खूप सारे असतात
उत्तरे तू देशील का ?
डोळ्यातले भाव जाणून माझ्या
स्वतः येउन बोलशील का?

*******************

काही प्रश्न अनुत्तरित असतात....
ते तसेच राहू देत.....
अन आपल्या पुढच्या
भेटीची ओढ वाढ्वू देत.....

*******************

नुसत डोळ्यांनी तरी प्रेम
किती दिवस व्यक्त करणार
मनातल्या भावनांना
ओठावर कधी स्थान मिळणार?

*******************

सादेत तुझ्या जाणवली
नाही ती आर्तता
करू कशी मी तरी
तुझ्या स्वप्नांची पुर्तता

*******************

माझ्या सादेकडे तुझं
लक्ष तरी कुठे होत.....
तुझ मन दुसर्याच
स्वप्नांच्या राज्यात गुंतल होत...

*******************

नुसत्या डोळ्यांनी प्रेम् करण्याची
मजा काही और असते......
थोडीशी जादू,थोडीशी धुंदी,थोडीशी नशा,
अन् थोडीशी सजा असते.....


*******************

स्वप्नात अवतरून ही
प्रत्यक्षात न भेटू शकलीस
सागरडोहात बुडणार्‍या मज
काडीचाही आधार न देऊ शकलीस

*******************

डोळ्यातल्या भावना शब्दात
मांडता प्रेम अजून खुलते
त्या वेळीच तर प्रेमाचे
खरे रूप साकारते

*******************

आधार देण्याचा मी प्रयत्न केला....
पण तु माझा आधार नाकारला.....
अन् तुला वाचवण्याचा माझा.....
हर प्रयत्न निष्फळ ठरला.....


*******************

प्रेमाची सगळीच रुप निराळी......
कधी रम्य वनराई..
कधी ॠतु वसन्त....
तर कधी रात्र काळी....

*******************

वाचवायला गेलीस पण
माझे मन वाचू शकली नाहीस
स्वप्नात आधार दिलास पण
प्रत्यक्षात समोर आली नाहीस

*******************

प्रत्यक्षात नाही .....
तरी स्वप्नांत भेटू.....
अन् एक दिवस प्रेमाची.....
शिखरे गाठू .......

*******************

प्रेम तिनं करू नये जिला
मझ्या भावना कळत नाही
शुन्य गुंतवणकीवर कधी
परतफेड मिळत नाही
----------------------
प्रेमात कशाला रे .....
गुंतवणूक अन् परतफेडीही भाषा.....
त्यात तर सर्वस्व लुटूनही.....
हसण्याची आशा......

*******************

Q- प्रेमात कशाला रे .....
गुंतवणूक अन् परतफेडीही भाषा.....
त्यात तर सर्वस्व लुटूनही.....
हसण्याची आशा......

A-सर्वस्व तर केव्हाच
लुटून बसलं आहे
मी तिच्यावर आणि
जग माझ्यावर रुसलं आहे

*******************

रुसवे फुगवे कशाला आता....
जेव्हा प्रेमाची बात......
जगाच्या ही पुढे जाऊ...
जर देशील मला साथ....

*******************

साथ देइन
सात जन्मांपर्यंत
जन्मल्या पासून
अगदी मरण्या पर्यंत

*******************

जन्म-मरण ना असे ......
आपुल्या हाती..
स्वर्गातुनच जुळून येती ......
जन्मोजन्मीच्या गाठी....

*******************

जन्म मरण जरी नसले
आपल्या हाती
जगे पर्यंत असेल
हात माझा तुझ्या हाती

*******************

हात पकडायला खूप
जण असतात तत्पर
पण जीवनभर साथ द्यायला
कुणी नसत तयार

*******************

Geeta this one for u
स्वर्गात जर जुळून येती
जन्मोजन्मीच्या गाठी... तर
सारखी का तुटत असतात
इथे प्रेमाची नाती

*******************

अरे हात पकडनार याचा अर्थ
शब्दशा घेऊ नकोस
इतरांसारखी तू ही माझी भावना
शब्दात पकडू नकोस

*******************

एकदा हात दिला की
परत मागे फिरणार नाही ....
आपल्यामधे आता मी
सावलीला पण येऊ देणार नाही ....

उरलेले सर्व क्षण आता तुजे जाले ...
आले मी सख्या..सर्वस्व सोडून आले...

*******************

बराच फरक आहे
आली म्हणने आणि येण्यात
बराच फरक आहे
माझी झाली म्हणने आणि होण्यात

*******************

हात पकडायला तर आधी
सारेच जवळ येतात ..
नंतर मात्र हातावर केवळ
अश्रु देऊन जातात

*******************

मी फ़क्त तुजीच होते अणि तुजीच राहणार...
जाऊ दे रे....
अधि कधीच समजुन घेतल नाहीस मला...
तू आता काय घेणार??

*******************

फ़क्त हात मागत नाही
हाता संगे मन दे
ठराविक काही मागत नाही
काहिपण दे

*******************

तुला समजुन घेण्यात
मलाच हरवून बसलो
तू गेल्यावर आयुष्यच
गमावून बसलो

*******************

समज नव्हतीच मला
हे तुला आधीच समजावलं होतं ना ?
तरी समजुन घेशील मला
हे तूच सुनावलं होतं ना ?

*******************

मन मागण्या आधी
माझ्या मनातल तर जाण
हात पकड़ण्यासाठी आधी
तुझा हात तर पुढे आण

*******************

तुझ्या जाणिवेची नक्कीच
आहे मला जाण
उगीच नाही होत ही
नजरेची देवाण घेवान

*******************

नजरेची देवाण घेवाण ??
प्रेम आहे दोन मनांचा मेळ....
तू स्वताच बनावलेस नियम..
अन केलास माज्या आयुष्याचा खेळ...

*******************

दोन
मनांचा मेळ ?
असे बोलूनच मारून नेली
तू प्रत्येक वेळ

*******************

धडपड अजुनही सुरूच आहे
तुला समजुन घेण्याची...
आस अजुनही तशीच आहे
तुझ्या पापण्यांच्या सावलीत झोपायची....

*******************

माझ्या पापण्यांच्या सावलीत
तुझचं स्वप्न नवं होतं
तू समजलं असतं तर मला
आणखी काय हवं होतं

*******************

स्वप्नातच तुझ्या रमलिये मी ....
कधीतरी स्वताहून बोलशील
या आशेवर जगलिये मी...
समजते तर सगळे काही
पण समोर येउन कधीच
तू बोलत का नाही??

डोळ्यात बघून माझ्या
फक्त एकदाच बोल ना..
ह्रुदयाचे बंद दरवाजे तुझ्या
माझ्यासाठी खोल ना...

*******************

हृदयचं कवाड खोललं
तर सांग चालेल तुला ?
समोर येउन मनातलं बोललं
तर सांग चालेल तुला ?

*******************

उघड तुझ्या ह्रुदयाचे कवाड ....
खुप पाउस पाड...

पण...

आधी एवढ दुखवलयस की..
ह्रदय चिम्ब भिजवलस
तरी कोरडीच राहीन मी...
आसवांचा महापुर दिलास
तरी हसतच राहीन मी...

*******************

तू दुखी असताना
मी हसणं शक्य नाही
तू माझी नसताना
माझं असणं शक्य नाही

*******************

तू होशील माझी जेव्हा
मी असेल आसमांत
चंद्रापार घेउन जाइल
तुला मी दिमाखांत

*******************

Sukh ani dukkha,
shevti mananyavar asta...
ekhadyacha asna kinwa nasna,
varvar sangnyavar asta.........

*******************

नको होऊ दुखी तू
अशीच हसत रहा
जेव्हा होशील माझी तू
सरे सुख देइल पहा

*******************

एकटं एकटं सुख
किती विद्रूप वाटतं
तू सोबत असलीस तर
दुख सुद्धा सुखरूप वाटतं

*******************

दुखाचा प्रश्नच येत नाही
तू सोबत असलास तर....
पण परत येउच नकोस
पुन्हा सोडणार असलास तर....

*******************

होतास सोबत तेव्हा
मिळायची जगण्याची स्फुर्ती
पण आता सोबत आहे
फ़क्त अश्रुंची गळती


*******************

सोडायच तर तुला तेव्हाही नव्हत
पण तुझ्या डोळ्यात
दुसर्‍याबद्दल प्रेम
मला नव्हत बघवत

*******************

मी तुला सोडेन याचा
विचार सुद्धा करू नकोस
तुझ्या तू सुख चालून येइंल
दुखाचा विचार सुद्धा करू नकोस

*******************

प्रेमात पडताना तर
करतोस खूप सारे वायदे
पण पाळायलाच विसरतोस
प्रेमाचे सारे कायदे

*******************

माज्या डोळ्यात तू
नीट पाहिल असतस....
तर आज चित्र नक्कीच
काहीतरी वेगळ असत...
निदान तुझ्या अंगणात तुलस
अन माज्या दारी निवडुंगच रोपट नसत...

*******************

तू माला सोडून जाशील
हा विचार मी
तेवाही केला न्हवता....
मला तुला हे सांगायला लागेल
हे तरी तेव्हा कुठे ठावुक होत??

*******************

विचारत फिरू नकोस
सत्यात ये
भुतकाळात जाऊ नकोस
सध्यात ये

*******************

chitrat majhya tu ,
jar rang bharle aste,
nivdungawar suddha,
gulab fulale aste...

*******************

तुझ्यासाठी मी फुलांची
परडी सजविली
पण तीच फूले तू
माझ्या अर्थीवर वाहिली

*******************

अर्थहीन जगण्यात
काय अर्थ आहे
त्यापेक्षा स्वखुशीने
मरणं सार्थ आहे

*******************

तुझ्या डोळ्यात कित्येकदा
मी चंद्राचे रूप पाहिले
याच चंद्राच्या शितलतेने
शेवटी मला जिवंतपणी जाळले

*******************

एक तर न विचारता
डोळ्यात डोला घातलास
घातलास तर बघताना
गोगल का नाही घातलास

*******************

नेहमी माझ्या हाताची
अपेक्षा करत असतोस
पण हात पुढे करताना
शेम्बुड तरी का पुसतोस ??

*******************

चित्रात तुझ्या मी रंग
नक्कीच भरले असते
आई शप्पथ, सांगतो
जर मी ते आणले असते

*******************

चित्रात तुझ्या मी रंग
नक्कीच भरले असते
जर ते चित्र कसले आहे
हे मला कळले असते

*******************

चित्रात तुझ्या मी रंग
नक्कीच भरले असते
पण माझे रंग
वाया गेले असते

*******************

चित्रात तुझ्या मी रंग
नक्कीच भरले असते
जर ते चित्र
विचित्र नसते

*******************

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मी हृदयात साठवलेला
पण नंतर तोच प्रत्येक क्षण
माझा जीव घेण्या उठला

*******************

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मी हृदयात साठवलेला
पण मध्येच कुणीतरी
दरवाजा ठोठावला

*******************

ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला, आजवर माहितीये
ओठावर ठेवतो खोटं हसू
खुप दुखतं खोलवर माहितीये
pan me kay boltoy raj
ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला,
मग इतके दिवस तू
जिवंत कसा राहिला?

*******************

ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला,
अन राज दचकून
झोपेतून उठला

*******************

ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला,
अन राज दचकून
झोपेतून उठला
अन खंजीर लपवून
परत झोपला

*******************

अपेक्षा नाही करत मी
मान्य, प्रेमात ही वाद हवा
पण दोन हाकांना किमान
एक तरी प्रतिसाद हवा

*******************

मी तर हाक
दिली खुप
पण ती बाहिरी होती
यात माझी काय चुक

*******************

ज्यावर प्रेम केलं,
त्यानेच खंजीर खुपसला,
अन राज दचकून
झोपेतून उठला
अन खंजीर लपवून
परत झोपला
अणि तशा अवस्थेतही
गाढ़ झोपून राहिला

*******************

मान्य करतो तू दिलीस खूप हाक
पण इतका कर्कश आवाज ऐकायची
तिला सवय नसावी हयात
तिची तरी काय चुक??

*******************

अरे वेड्या ती बाहिरी आहे
असा मी सांगितलं ना
ती कशी ऐकणार
की तू पण बहिरा आहेस

*******************

daav bhandun tandun
modu nakaa.
aapaaplya aapanach
sudhara chukaa..


*******************

आधी तिच्या कानांना
नीट ऐकू यायच
पण तुझ्या आवाजामुळे आता
रोज कानांच्या डॉक्टरकड़े जाव लागत

*******************

स्वर्गात जर जुळून येती
जन्मोजन्मीच्या गाठी... तर
सारखी का तुटत असतात
इथे प्रेमाची नाती
-----------------
REPLY
प्रेम्,प्रेम् म्हणतात
ते समजलय कोणाला
नुसत आकर्षण
तरीही प्रेमाचा बोलबाला

*******************

प्रेम यशस्वी झाल की
असते ते महान
पण फसले की त्यास
ठरवतात आकर्षण

*******************

प्रेमाला आकर्षण बोलून
करत्येस त्याचा अपमान
त्याहून इतर कुठल नात
आहे का महान?

*******************

प्रेम कधी फसवे नसते
फसवतात् ती माणसं
फसवतात ती फसवतात अन्
दोश मात्र नशिबाला लावतात

*******************

प्रेमात मी तुला
फसवल नव्हत
तुझ्या इतक मी
स्वतः लाही जपल नव्हत

*******************

इतर नाती नसतील
ही एवढी महान
पण म्हणून त्याना कमी
लेखून करू नकोस लहान

****************

प्रेमाच नात आहे
इतर नात्यांहून श्रेष्ट
जीवनात त्याहून आहे का
इतर काही मीष्ट ?

****************

मी कुठं म्हटल
तु मला फसवलस...
पण दूर जावून.....
मला मात्र सतवलस.....

****************

जीवनात फक्त प्रेमच नव्हे
तर कर्तव्य् ही असतात
अन् तुझ्या प्रश्नाच उत्तर हेच्
कि म्हणून प्रेमाची नाती तुटतात

****************

दूर तर आपण
तेव्हाही होतो
सर्व बाबतीत जवळ
असूनही मनाने दूर होतो

****************

कर्तव्याप्रती माणस
प्रेम तोडतात
नंतर मात्र
कर्माने रडतात

****************

मनाविषयी काय रे बोलायच...
कारण मनापेक्षा ही चपळ
दुसर काय शोधायच.....

****************

मानतो मन असत
खूप चंचल
पण त्याहून असत
का काही प्रेमळ ?

****************

प्रेम् कधी तोडल किंवा जोडल
जात नाही..
अरे वेड्या त्या भावना कधी
समजावल्या जात नाही

****************

काळ कधी का
कोणासाठी थांबतो
जर तो थांबला तर
सजीव तिथेच सम्पतो

****************

मानतो प्रेम
आहे एक भावना
पण त्यात मिळते
का मग वेदना??

****************

जरी दोघानी जगायच असल
तरी भोवतालच जग ही
त्यात शामिल असत
म्हणूनच त्याला बंधन म्हटल जात

****************

manus jari sampala tari prem sampat nasat .......!
te japun theun pudhachi sat janma vaparaycha asta..

****************

aga jag fakta naval asta ............
shevtchya ghatkela konihi bajula nasta...

****************

प्रेमातल्या वेदना ह्या
मानण्यावर असतात
जरी नको म्हटल तree
सर्वानाच हव्याश्या वाटतात

****************

जगाचा विचार करताना
आपल प्रेम का संपवायच
इतरांसाठी त्याला बंधनाच्या
जाळ्यात का अड़कवायच

****************

बाजुला कोणी नसल
तरी मनात भीती असते
कोणी तरी पाहील म्हणून
आपलेच मन आपल्याला खात असते

****************

प्रेम केल मग
का घाबरयाच ?
इतरांसाठी आपल्या
मनाला का मारायच?

****************

जरी ते बंधन असले
तरी पाहीजे सगळ्याना
म्हणूनच जो तो तयार असतो
ह्या जाळ्यात अड्कायला

****************

प्रेमात नसावे
कशाचे बंधन
असावे फ़क्त
चांदण्यांनी भरलेले अंगण

****************

ani tya anganat asav chandrach chandana...............
ti asavi hat dharun nahi ajun kahi magana......

****************

कारण प्रेम लपून छपून करण
ही सुध्दा एक कला असते
सगळ्यानाच कळत नसते
जि एकांतात फुलासारखी खुलते

****************

प्रेमात पडताना
नसते हयगय
मग ते करताना
वाटावे कसले भय

****************

प्रेमात पड्ल्यावर चंद्र अन
चांदण्या दिसतात
अन प्रेमाच भूत उतरल्यावर
डोळ्यासमोर काजवे चमकतात

****************

prema chya navane jo ghabarla to prem kay karanar................
moklya hati ya jagat ala moklya hatich maranar........

****************

aga kajve sudha fakta andharatch distat...........
sarvani sath sodli ki manse premachach hat pakadtat..

****************

प्रेमात पडतो तेव्हा
माणूस स्वतःलाही विसरतो
तिच्यासमोर तो चन्द्रही
फिका पडतो

****************

जरी मोकळ्या हाती आल तरी
जगाला काही तरी देवून जाव
खुप् नाही पण थोड्या तरी
चांगल्या आठवणी मागे ठेवून जाव

****************

jagala athavani dyayla kahich harakat naste..........!
pan roz maranaryachi jag dakhal ghet naste............!

****************

जगाला देता देता
आपण ही थोड जगाव
एकदा तरी प्रेम
करून पहाव

****************

प्रेमात विसरणच तर
धोका देवून जात
कारण जग म्हणत म्हणत
एक दिवस खुद्द् प्रेमाचाही विसर पाडत

****************

प्रेम करण्याला काहीच
हरकत नसते
पण त्या प्रेमाचा अन्जाम
ही स्विकारण्यची तयरी ठेवावी लागते

****************

असल जरी प्रेम
विसरण अवघड
तरी नसत त्याहून
फळ कुठल गोड

****************

फळाची अपेक्षा करून केलेल प्रेम
हे प्रेम कसं
प्रेम तर् ते ही आहेच
आळवावर पाणी जसं

****************

गरजेच नाही की
प्रेम ठरेल नेहमी दुखद
खरे असेल तर
शेवटही असतो सुखद

****************

सुखद अन्ताच्या फ़क्त गोष्टीच
ऐकल्या
खर्या का खोट्या देव जाणे
कोणी पाहिल्या

****************

प्रेम करताना फळाची
अपेक्षा नाहीत करत
प्रेमात असताना इतर
कुठले फळ ही नाहीत चाखत

****************

are raja premala kadhihi shevat nasto................
paus gela mhanun samudra kahi atat nasto.....

****************

प्रेमाची अजुन सुरुवात
ही नाही केलीस
मग त्याच्या अन्ताची तरी
कशी कल्पना करू शकशील

****************

प्रेमच इतके आंबट गोड
मग दुसरी फळे कशाला
प्रेम हे प्रेमच त्याला
कुठ्ली ही उपमा कशाला

****************

प्रेम करायला कल्पनाशील
असाव लागत अस नाही
प्रेमात पड्ल्यावर सगळ आपसुक कळत
जस पोहोणर्याला पाणी

****************

प्रेमाला उपमा देणे
शक्यच नाही
त्याहून गोड फळ
जगात कुठले नाही

****************

पोहोण्यासाठी नदीत
उतराव लागत
लांबूनच नदीची खोली मोजण
शक्य नसत

****************

fal jari mhantala tari prem he badalat nahi............
halka ahe asa mhanun kahi parvat halat nahi............

****************

प्रेमाची ही कठीणच की
मोजण गर्ता
पण तरीही प्रेमात पडल्यावर
मग का रडता

****************

ayush he kahi nuste hasun jagayche naste......!
ashruna sudha baherche jag baghnyachi sandhi dyaychi aste.....

****************

प्रेमातल्या अश्रुंचे ही
स्थान असते खास
त्या खार्‍या पाण्यामुळेच
तर कळते प्रेमाची खरी मिठास

****************

पर्वताची उंची एक वेळ
गाठण शक्य आहे
पण प्रेमात "पडल्यावर"
आकाशाला हात लावण केवळ अशक्य आहे

****************

प्रेमात "पडायला"
होत नसते... तर
प्रेम पड़णार्‍यास
सावरत असते

****************

खरी आहे प्रेमाची मिठास
ही आगळीच असte
प्रेमाची हर एक अदाच
निराळी असते

****************

ya jagat ashakya asa kahich nasta........!
ulta premat padlyavar he jagach apla asta...........!

****************

प्रेमाचे वाहतात
जेव्हा झरे
रंग सामावण्या इन्द्रधनुही
पड़ते अपुरे

****************

तुझ्या प्रेमात मी
आकंठ बुडाले
पण मीप्रेमात पडले नाही
तर पंख लेवून आकाशी उडाले

****************

माझ्या त्रुषित मनाला
प्रेमाचा झरा दिसला
त्या क्षणी मला तो थेंबही
समुद्राहून मोठा वाटला

****************

प्रेमातल्या यातनांच्या भीतीने
नसत घाबरायच
फुलवाट समोर असताना
काट्यांवरून नसत धावायच

****************

प्रेमातल्या यातनांच्या भीतीने
नसत घाबरायच
फुलवाट समोर असताना
काट्यांवरून नसत धावायच
----------------------------
काट्यातुन धावतानाच
प्रेमाची किमंत कळते
अन विश्वासाने प्रेम करण्याची
हिमंत मिळते

****************

जरी मी लिहीत असले.......
तरी प्रेरणा दुसरच कोणी आहे....
जस चंद्र प्रकाशला....
तरी स्त्रोत मात्र सुर्यच आहे..

****************

सुर्य स्तोत्र असला तरी
चंद्राची शीतलता नाही येत नाकारता
प्रेरणा जरी असली तरी
सगळीच चित्र नाही येत आकारता....


तुझी प्रेरणा आहे म्हणुन
हे सारं जमलं
मनातल्या भावनांना
शब्दांत गुंफलं

****************

प्रेरणा असल्याशिवाय
शिल्प कुठ घडत
प्रेरणेशिवायच तर
भल्या भल्यांच घोड अडत

****************

तुझी प्रेरणा आहे म्हणुन
हे सारं जमलं
मनातल्या भावनांना
शब्दांत गुंफलं
-----------------
मनातल्या भावनांना
वाट करुन द्यावी नेहमी
कधी थोडी जास्त
कधी थोडी कमी

****************

काट्यांवरून वरुनहि चाललो होतो ग सखे
पायही होते रक्ताळलेले..
तू त्यांची दखल घ्यावी अशी नाही अपेक्षा केली मी..
पण तू नाहीं पाहिलेस ते डोळे पानावलेले

****************

रक्ताळलेल्या पायांची....
तुला आली कणव.....
पण रक्ताळलेले ह्र्दय बघून.....
थोडी तरी हेलव..

****************

काट्यातुन धावतानाच
प्रेमाची किमंत कळते
अन विश्वासाने प्रेम करण्याची
हिमंत मिळते
---------------------------------------------
प्रेमातल्या काट्यांचाही
स्पर्श असतो न्यारा
सुगंधाशी मैत्री करण्या तर
तत्पर असतो वाहणारा वारा

****************

वाहणार्या वार्याला अडवणे
महाकठीण कर्म
पण अशक्य ही करून दाखवणे
हाच प्रेमाचा धर्म

****************

तू किती ही अडवलं वार्याला
तरी तो वाहणार
तुझ्या धर्मासाठी तो त्याचा धर्म
थोडीच गहाण ठेवणार

****************

प्रेम या शब्दात
अर्थ तरी केव्ह्डा....
हिमालयाच्या सावलीलाही
पुरून उरेल एव्ह्डा...

****************

हिमालायावर ही बहुतेक कुणी
प्रेम केले आहे
म्हनुनच त्याचे अश्रु सारे
गोठून गेले आहे

****************

कुणाचं लक्ष्य आहे
का इकडे ?
कवितांचा दुष्काळ पडल का काय
सगळीकडे ?

****************

प्रेमाला नसते
काही वाचा
तुटले तर उरतात
फक्त काचा

****************

प्रेम म्हणजे आयुष्यातील
नितांत सुंदर वास्तु
handle with care लिहिलेली
एक अमूल्य वस्तु

****************

"प्रेम"....
दोन अक्षरात मर्म तरी केव्ह्डे...
जसे...
बाभलीच्या वनात दोनच सुगंधी केवडे..

****************

आज आईने डब्यात
दिले होते घेवडे
बाकि सगळं खाल्लं
घेवडे राहिले तेवढे

****************

प्रेम म्हणजे
जणू काचेचे भांडे
तुटले एकदा तर
अवघड जोड़णे

****************

आईच्या हाताची चव
तुला काय कळणार
गोड़धोड़ सोडून तू
तिखटच चरणार

****************

खुप झाला
खेळ
चला जायची
झाली वेळ

उदया भेटतो मित्रानो
उत्तर तयार ठेवा

****************

खेळ तर मित्र
आत्ताच सुरु झालाय
खेळण्याआधीच तू
मागे फिरू लागलाय

****************

वेळ आली की सर्वांनाच जावं लागतं
यात काही वाद नाही
मी पण मानुस आहे
कोणी अपवाद नाही

****************

आईच्या हाताची चव
तुला काय कळणार
गोड़धोड़ सोडून तू
तिखटच चरणार

****************

खेळ तर मित्र
आत्ताच सुरु झालाय
खेळण्याआधीच तू
मागे फिरू लागलाय

****************

वेळ आली की सर्वांनाच जावं लागतं
यात काही वाद नाही
मी पण मानुस आहे
कोणी अपवाद नाही

****************

वेळ आली की सर्वांनाच जावं लागतं
यात काही वाद नाही
मी पण मानुस आहे
कोणी अपवाद नाही
-----------------------------------
प्रत्येक गोष्टीला अपवाद
हा असतोच
माणूस जरी असला तरी
त्यातही एखादा अश्व्त्थामा असतोच

****************

छान जुगलबंदी जमली होती...

कोणी आहे का???

तुमच्या ह्या खेळात
सामिल होणार आहे मी ही
सगळ्याच वेळ नाही पाळता येणार
तेव्हा माफी असावी तुमची

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्यावर बोलु काही...

सोपंच तर आहे म्हणुन
आयुष्याचं गणित सोडवत बसले
प्रत्येक पायरीवर
एक नवीन गुंता उकलत बसले

****************

तुमच्या ह्या खेळात
सामिल होणार आहे मी ही
सगळ्याच वेळ नाही पाळता येणार
तेव्हा माफी असावी तुमची
-------------------------
वेळ पाळता आली नाही तरी
मन तर इथेच असेल ना
पुर्ण कविता नसुदे पण एखादी
चारोळी तरी गुणगुणशील ना

****************

सोपंच तर आहे म्हणुन
आयुष्याचं गणित सोडवत बसले
प्रत्येक पायरीवर
एक नवीन गुंता उकलत बसले
------------------------------
आयुष्याच् गणित
कधी कोणाला उकललय का
अग कितीही अधिक उणे केले तरी
हातात काही शिल्लक राहिलय का

****************

वेळ पाळणे जमेल ही एखाद्यावेळी
पण मनाला कशी आवरु
बांध फुटु पाहणारया शब्द्प्रवाहाला
चारोळीने कसी अडवु...

****************

वेळ पाळणे जमेल ही एखाद्यावेळी
पण मनाला कशी आवरु
बांध फुटु पाहणारया शब्द्प्रवाहाला
चारोळीने कसी अडवु...
---------------------------------
सुटु दे मोकाट तुझ्याही मनाला
उगाच का आवरायच त्याला
कधी एखादा अविष्कार ही घडवेल
सांगता येइल कुणाला

****************

मावळता सुर्य
जणू धरतीला सांगतो
वाट बघ माझी
पुन्हा तुला भेटायला येतो

****************

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top