Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

निवडक पु.ल...

Share










निवडक पु.ल.

एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की

माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.

माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.

तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"

अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले,
' चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज & एण्डस वुईथ लिचीज.
' चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते.
जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. '

चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !'

त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
 
वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,
"हा मझा मित्र शरद तळवलकर"
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,
हा चांगलाच असरणार!"
"हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.
"अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.
म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"
 
पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा
र्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान
होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.

त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती.
शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं,
की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला.

त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही."
तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला,
"पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.
एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".

ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात.
'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.
समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते.
मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं
ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."
 
एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"
 
एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या.
सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली
" अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?"
त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!"
 
पु.लं. चा वाढदीवस होता,
एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचन्दाचा हार घातला.
पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.

हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?

पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही"

घरात हशा पिकला होता !.
 
बोले तैसा चाले" ह्या विषयावर पु.ल. शाळेतल्या वक्तृत्वस्पर्धेत म्हणाले, "माझा ह्या उक्तीवर मुळीच विश्वास नाही, कारण 'बोले तैसा चाले' असा माणूस फक्त दारूडाच असतो.
.
एकदा एका कार्यक्रमात एका कवीने आपली रटाळ कविता पुलंना ऐकवली आणि त्यावरचा त्यांचा अभिप्राय विचारला.

"व्हेरी गुड पोएम" पु.ल.म्हणाले"कविता मराठी होती त्यामुळे खरे तर तुम्ही मराठीतून अभिप्राय दिला पाहिजे." तिथे उपस्थित असलेले एक साहित्यिक म्हणाले.

"बरोबर आहे" पु.ल. म्हणाले "पण त्याचं काय आहे, मला फक्त इंग्रजीतून खोटं बोलण्याची सवय आहे"
 





 







--
sumit love to friends

शनिवार, २४ एप्रिल, २०१०

माझ्या मनात तुझे येणे-जाणे...

Share

माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
हे आता नेहमीच झाले आहे
जेव्हापासुन पाहिले तुला
हे मन तुझ्यातच गुंतले आहे

माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
फक्त स्वप्नापुरतेच राहीले आहे
कारन तु मझ्या मनाला
कधीही न समजु पाहे

माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
हे कधीच थांबणार नाही
तु कितीही ढुर गेलास तरी
आठवण आल्यविना राहणार् नाही

माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
सुखढ् स्पश॑ करुन जातो
तुला एकदा तरी भेटण्याची
हे मन सतत ईच्छा करु पाहतो

माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
डोळ्यांत आपोआप अश्रु आणतात
कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला
तरी नदीसारखे वाहु लागतात

माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
हे अंतिम श्वासापय्रत राहिल
तु जरी मला भेटला नाहिस
तरी हे वेड मन तुझीच वाट पाहिल

विचार कर!!!!

Share



विचार करत होती मी
कोण माझा विचार करतय का?
विचार करुन सांग मला
तु मझा विचार करतोस का?
जर करत् असशील विचार् माझा
तर पुढे काय विचार तुझा?
जर करत नसशील विचार् माझा
तर का करत नाहीस विचार माझा?
मी तुझा विचार करत असताना
तु माझ्याबद्द्ल अविचारी का?
हा प्रश्न मी तुला विचारलाच् का?
ह्याचा विचार तु कधी केलास का?
विचार करुन विचारते तुला
जर् पटला माझा विचार तुला
तर कळव तुझा विचार मला

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला

Share


अग्गोबाई-ढग्गोबाई" या अल्बममधल्या "दूर देशी गेला बाबा" या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्या भूमिकेतून "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. "आयुष्यावर बोलू काही" च्या ५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं:










(सलीलचा आवाज) पद्य:

कोमेजून निजलेली एक परी राणी

उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी

रोजचेच आहे सारे काही आज नाही

माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही

झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत

निजेतच तरी पण येशील खुशीत

सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.....



आटपाट नगरात गर्दी होती भारी

घामाघूम राजा तरी लोकलची वारी

रोज सकाळीच राजा निघताना बोले

गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले

जमलेच नाही काल येणे मला जरी

आज परि येणार मी वेळेतच घरी

स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी

खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी

मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....





(संदीपचा आवाज) गद्य:

ऑफिसात उशीरा मी असतो बसून

भंडावले डोके गेले कामात बुडून

तास-तास जातो खाल मानेने निघून

एक-एक दिवा जातो हळूच विझून

अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे

आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे

वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे

तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे

उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी

चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी





(सलीलचा आवाज) पद्य:

उधळत खिदळत बोलशील काही

बघताना भान मला उरणार नाही

हसूनिया उगाचच ओरडेल काही

दुरूनच आपल्याला बघणारी आई

तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा

क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना...







(संदीपचा आवाज) गद्य:

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई

मऊ-मऊ दूध भात भरवेल आई

गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी

सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी





(सलीलचा आवाज) पद्य:

कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही

सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही

जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला

आईपरी वेणी फणी करतो ना तुला

तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा

तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बापाची या कहाणी तुला....

ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....





(संदीपचा आवाज) गद्य:

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात

आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात

आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा

रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा

लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं

दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं





(सलीलचा आवाज) पद्य:

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून

हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून

असा कसा बाबा देव लेकराला देतो

लवकर जातो आणि उशीरानं येतो

बालपण गेले तुझे-तुझे निसटून

उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून

जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे

नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे

तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं

सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये

ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....



--- संदीप खरे

मंगळवार, १३ एप्रिल, २०१०

वाट

Share

मी एक यात्री आहे जीवनाच्या रस्त्यावरचा
माजी वाट जंगलातून आहे तरीही ती मी
चालणार आहे चालणार आहे
वाट माजी वाकदितिकड़ी
कत्याकुत्यानी भरलेली तरीही माज्या वाट्याला आलेली मी ती
थांबता थकता
चालणार आहे चालणार आहे
इथे संकटाना तोटा नाहि त्यांचाच वापर करून मी
संकटांच संकट होणार आहे आनी त्यावर मात करून
चालणार आहे चालणार आहे
वाट माजी फुलांची होणार आहे
सुगंध आनी मोहकता याने बहरून जाणार आहे
वाईट सम्पुन्ही एक दिवस चांगले येणार आहे
ही वाट्सुधा मी पाहणार आहे पाहणार आहे

नियति

Share

दईवान दिला नाही अणि कर्माण नेल नाहि
अस कधी होतच नाही आणि कस म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
काळ अणि परिस्थिती यांची कधी दिलजमाई
होतच नाही कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
करायला जातो एक अणि होत भलतेच
हे ठरलेल समीकरण आहे
तरीही तेच तेच होत दोषी म्हणून बोट दुसरीकडे होत
आपल्यावर कुणी काही घेतच नाही
कस म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
जीवन म्हणजे अलवावर्चा पानी
ते त्यावर टिकात्च नाही
कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
म्हणतात गोष्टी योगायोगान घडतात
पण तो योग आमच्या आयुष्यात येतच नाही
अणि ओढून ताणून अनाण्याचा
प्रयत्नही आम्ही करत नाही
कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
प्रयत्नाला कष्टाची जोड़ आम्ही देतच नाही
बसल्या जगी सगल होइल याची वाट पाहतो
आणि इथेच आमची गणीत चुकतात
याची दखल आम्ही घेतच नाही
कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
शेवटी नियतीचे फासे होते
आम्हाला नंतर कलत
पण वलतच नाही कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही केलच नाही

भावना

Share

भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
हृदयाच्या गावात मन हे वस्तुपरी
त्यावरी क्षणाक्षनाचे घेतलेले घाव होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
माझे मीपण ना उरले जरी वंचितांचे प्रहार होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
सोसलेल्या घावातुनी मन घनापरी जाहले
आता त्यावरी कितीही जोर पडला
त्याचे वेगळाले भाव होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
आता तिथे वसली घरे जरी अनन्त यात्नातुनी
त्या घरावर फुलापरी अश्रूंची माळली तोरणे
त्या तोरणावर वसलेले आपलेपणाचे भाव होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
भावनांच्या कल्लोळातून निघाली अनंत भाषणे
सहण्याला मिळालीही बलाचीही लोचने
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
भावनांच्या नात्यातला गुंता फार वाढला
गुंत्यात ना गुंतता मी स्वतःला काढले
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
जीवनाच्या शिदोरीवर भावनांचे राज्य होते
जगणे त्याविन फार यातनामय होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते

जीवन

Share

माजे जीवनगाने संपताच संपत नाही
मी कितीही पुरून उरलो सरताना सरतच नाही
गाडीची दोनच चाके चढ़ उतार बघतच नाही
रस्ता हा कालोखाचा संपताच संपत नाही
रोज नवी उभी समस्या ती रोज कशी सोडावी
रोजचे नित रडगाणे संपताच संपत नाही
आता असे वाटते सर्वच प्रश्नही सुटले
पण श्वास सोडताना पुढे नविन उभे असते
आयुशाला जाता सामोरा अड़चनींचे मोठे जंगल
रस्ता तुडाविताना हा संपताच संपत नाही
प्रश्न सोडविताना उत्तरच ठावुक नसते
हे आयुष्याचे नित गाणे संपताच संपत नाही
कितीही ठरवले जरिही थाम्बयाचे नाही
थाम्बा येयितोवर धीर बघ हा खचतो
जावयाचे कुठल्या गावा तो रस्ता सापडत नाही
अड़चनींचे बहाने संपताच संपत नाही
संकटा जाता समोरा सांग मी काय करावे
हे संकट आहे की संपताच संपत नाही
शोधली वाट नवी ही नजरेआड होवूनी
ही वाटच आहे परि संपताच संपत नाही
हिचा जरी शेवट जाला तरी तो शेवट नसे मजला
अंधारातून प्रकाशाला एक दूत रस्ता देवून गेला

समाधान

Share

आज मला फार शांत वाटतय
खुप गढ़ुल पानी स्वात्चा जाल
काहीतरी मिळाला काहीतरी सापडला
याचा याची जाणीव आहे का ?
मन समाधानान भरून गेल आहे
मला काही फार मोठी संपत्ति मिळाली
असहि नाही त्याहीपेक्षा खुप मोठी गोष्ट मिळाली आहे
सर्वा काही पैशात मोजयाचा नसता
तिमिरापलिकडे प्रकाशाचा जग असत
तेच मला दिसला आहे
आणि माजा जगनच बदलून गेला आहे
आता काही मिळावा काही घ्याव
ही भावनाच संपली आहे
काही देता आला तर फार बर ही
उदात्त भावना मिळाली आहे कलाली आहे
हा प्रकाश सत्याचा असू दे
अन्धाराताही त्याचा
ठसा वसु दे ठसा वसु दे

हव्यास

Share

सांग माणसा तुज काय हवे
बोलाल्याविना ही भावना मुकच ना
बोलणे परि हे नित्य नवे नित्य नवे
संग माणसा तुज काय हवे
मिलाली जरी आशांची फुले
फुलल्याविना ती सुगन्धित ना
बोल माणसा तुज काय हवे
पैशासाठी हे खेल भावनांचे वंचित ना
तुजसाठी परि हे नसे नवे
मग हीच भावना मूक होते ना
मनाचे हे जरी दुख नवे कधी थाम्बनार
कितीही मिळाले जरी तू असतुष्ट ना
मग कशासाठी ही धाव रे सांग ना
तुज काय हवे काय हवे
गरजा आशा वाढतात ना
त्यासाठी ही नवी याचना काय रे तुजे हे जिने
गरजेपुधे असे ठेन्गने
सांग ना तुज काय हवे काय हवे
पक्षी जरी गगनावरी रोज विहरति
त्यांची मागणी एकच ना पोट ना
पुसले जरी देवाने तुला
नव्या दिवसांची आलोचना
ती कधी थाम्बेच ना
बोल रे तुला काय हवे नित्य नवे

क्षण

Share

माजे मीपण न राहिले मागे किती क्षण राहिले
सोसल्या अनंता यातना जरी दुख बोलू लागले
माजे मीपणन राहिले
पाहीली स्वप्ने कितीजरी राहिली उराशी बिलगुनी
पूर्ण न होता राहिला अपुर्णतेचा शाप हा
जगताना जगी या दिल्याघेताल्याचे वाटेकरी
चालताना रास्ता दिसे कात्यापरी
तो सरताना सरतच नाही परि सर्वही भोगने
मागे किती क्षण राहिले
पाहिले जरी मागे वलुनी बहुत गेले राहुनी
करण्यासारखे जगी या मन बोलू लागले
माजे मीपण न राहिले मागे किती क्षण राहिले

बिनधास्त माझ्यावर सोड...

Share

अप्राप्य आहे
तो तीर
म्हणून कदाचित
त्याची अशी
अनावर ओढ....

बेगुमान
हरपून टाकणारे
एकलेच
चिरंतन भटकणारे
मनाचे घोर वेड.....

प्राप्य जे
त्याचे इथे तिथे
पोसून झाले आहे
विणून घेतले आहेत
सारे पीळ, पेड...

देहाच्या या
पुरातन चक्राखातर
निमूट बराच
वेढून घेतला आहे
जगरहाटीचा जोड....

प्रवास
जीर्णशीर्ण होत जाताना
उरला नाही
काही मोह
यत्किंचितही तेढ....

अप्राप्य तू
असेच रहावे
एवढेच मागणे
बाकी सारे
बिनधास्त माझ्यावर सोड...

म्हणून जन्म हा असा

Share

सुरूवात, शेवट
सारे तेच, तसेच
फक्त मध्य
तुमचा आमचा
सर्वांचा वेगळा;

पडदा वर आहे
तोवर धावपळ
देह रसरसता राखण्यासाठी
मनही हवे जिवंत
म्हणून पसारा सगळा!


कलंदर ईशत्वाला
सहज सोबत घेऊन
थिरकली पावले
शून्यत्व निमाले
भास उरला सगळा.

’एको॓Sहम" तू म्हटलेस
पण नाही म्हटले मी
’बहुस्यामः’ चुकून एकदा
म्हणून जन्म हा असा
सुखाचा, तरीही वेगळा!!

विझता विझता स्वतःला....

Share

नारायण सुर्वे यांची ही एक कविता.

विझता विझता स्वतःला सावरण्याची किमया सर्वांनाच जमते असे नाही..
किंवा असेही होते की, अनेकदा ही किमया जमली तरी कधीतरी एखादा क्षण असा येतो ... की ते जमत नाही. आपल्या डोळ्यांसमोर बघताबघता माणसे जगण्याची ऊर्मी गमावून बसतात... अनेकदा त्यांना असेही जगावे लागते की त्या जगण्यापेक्षा खरे तर मरणही परवडावे...

आपले असे तर होणार नाही ना, किंबहुना आपले आधीच असे ’विझणे’ तर झालेले नाही ना अशी शंका मनात येते.

ही कविता जगता येणे जमले तर आणखी काय हवे?


झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असे नाही.

असे किती हंगाम शीळ घालत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही.

शास्त्र्याने दडवावा अर्थ, आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवादच करा सांगणारे खूप: नाहीत असे नाही.

असे इमान विकत घेणारी दुकाने पाडयापाडयावर
डोकी गहाण टाकणारे महाभाग नाहीत असेही नाही.

अशा बेईमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वतःला सावरलेच नाही, असेही नाही.

काही कविता

Share

रोजचाच त्याने
धावा हा घेतला
गूढ डोहाच्या तळात
उभा अंगार पेटला.

युद्धे घमासानी
हळू प्राण हा बेतला
श्वासामागे श्वास
कसा, न कळे रेटला.


निसटून गेले, त्याचे
भय ना मातीला
उणे काही नाही
भेद जागत्या वातीला.

प्रपंच देहाचा
उन्मळे रातीला
पावसाची लय
अशी अखंड साथीला.

अदूर सुदूर
घन कधीचा मातला
झोपाळला आहे
परी कृष्ण तो आतला.

शनिवार, १० एप्रिल, २०१०

एकदा तरी माझ्या स्वप्नातून बाहेर ये

Share

एकदा तरी माझ्या स्वप्नातून बाहेर ये




रोजच झालंय तुझं माझ्या स्वप्नात येण..
माझ्या निजलेल्या डोळ्यात खेळण..
उशी बनून हळूच माझ्या मिठीत जाण..
शहारलेल्या देहाला उब देण..
रात्रीला जागत ठेवण ..
गुंफलेल्या मिठीला घट्ट करणं...
रोजच झालंय तुझं माझ्या स्वप्नात येण...
पण एकदा तरी माझ्या स्वप्नातून बाहेर ये !...
अंतरीतल्या स्वप्नांना सत्य रूप दे !...
वाट पाहतेय तुझी स्वप्नपरी ..,
तिला तिचा राजकुमार दे !!!!

तु आहे म्हणुन तर...

Share

तु आहे म्हणुन तर...
सगळं काही माझं आज आहे
हे जग जरी नसलं तरी
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.....

मोगरा फुलला होता कालही आजही
पण त्याचा गंध कळला तुझ्याचमुळे
रंग बिघडले असते माझ्या जिवनाचे
तु आहे म्हणुन तर...
प्रत्येक रंगाचा वेगळा बाज आहे

हरवतो स्वत:ला क्षणोक्षणी
तुला शोधण्यासाठी...
पण तु नाही सापडत
तेव्हा कळते मला खरचं
तु आहे म्हणुन तर...
मनात लपलेला एक राज आहे....

एक दिवस असा होता की

Share

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं


एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं


आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं


आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं


आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं


मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

हरवलेला मी

Share

हरवलेला मी

स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करीत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फ़ितुरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी

अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून

"असा काय रे बघतोस हरवल्यासारखा",
तू म्हणायचीस नेहेमी
"अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी"

"तुझं आपलं काहीतरीच"!
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी

सूर्याचं अस्ताला घाईघाईनं जाणं
अन् तुझं ते गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं....!

"येते रे", म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन् ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन् अजूनही हरवलेला मी
अन् अजूनही हरवलेला मी.......!

प्रेम

Share

प्रेमाच्या भाषा अनेक नाव एक
प्रत्येकाच्या मनात बसत याच गाव एक.....

ह्रुदयातून वाहतो याचा भाव एक
लहानापासून मोठ्यापर्यंत याची धाव एक.....

प्रियसीपासून मैत्रीपर्यंत याच्या भाषा अनेक
हे खर मिळाव जगात याची आशा एक.....

सर्वांच्या ह्रुदयात दिसते ही दिशा एक
खोट्या प्रेमात मिळते याची निराशा एक.....

प्रेमाच्या असतात भावना अनेक
विशवात वाहते याची कामना एक.....

डोळ्यातून ह्रुदयात उतरतो हा जीना एक
काळ कुठला ही असो याचा ज़माना एक.....

देवानी दिलेले हे वरदान एक
खरया मनात याच दान एक.....

तुटलेल्या ह्रुदयात याच रान एक
सर्व लोकात याचा मान एक.....

प्रेमाच्या भाषा अनेक नाव एक
प्रतेकाच्या मनात बसत याच गाव एक.....

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top