दिवसा स्वप्ने बघतो मी...
अजबरात्री जागत बसतो मी...
जगात वेडा ठरतो मी...
आशेवरती जगतो मी...
मलाच शोधत बसतो मी...
'अजब' मनाशी कुढतो मी...
दिवसा स्वप्ने बघतो मी...
अजबमध्यरात्री जागणे -
एक आयुर्वेदिक गझलमाफीचा साक्षीदार
॥ ॐ धन्वंतरये नमः ॥
मध्यरात्री जागणे वाईट असते
अन दुपारी झोपणे वाईट असते
सारखे रागावणे वाईट असते
सारखे वैतागणे वाईट असते
दूध अन फळ मिसळणे वाईट असते
फ्रीजचे पाणी पिणे वाईट असते
चिप्सपिझ्झे चापणे वाईट असते
कोकपेप्सी ढोसणे वाईट असते
दूध घेणे टाळणे वाईट असते
अन चहाकॉफी पिणे वाईट असते
प्रौढ स्त्रीला सेवणे वाईट असते
अन स्वतःशी खेळणे वाईट असते
यौवनाने माजणे वाईट असते
वृद्धपण नाकारणे वाईट असते
सप्तधातू बिघडणे वाईट असते
दोषतिन्ही बिनसणे वाईट असते
आळसाने लोळणे वाईट असते
नित्यकर्मे टाळणे वाईट असते
देह शाश्वत समजणे वाईट असते
आत्मबुद्धी विसरणे वाईट असते
त्याचं-तिचं आज break-up झालंय...
काय म्हणता..?
अहो खरंच,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...
तुझ्याशिवाय जगणं अन्
मरणंहि नाही,
असलं काहिसं
दोघंहि म्हणायची,,
नको-नको असतांनाही
एकमेकांना तरी बरंच झेललंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...
प्रेमाचे भास असतील कदाचित सारे
गोंडस अशा या नात्यातलं
प्रेम पूर्णपणे उतू गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...
खरं प्रेम lifetime असतं,
आज आहे अन् उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं,,
एकमेकांच्या विश्वासाचं
फूलपाखरू कधीच उडून गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...
तो म्हणतो ती अशीच आहे,
ती म्हणते तोही तसाच आहे,,
सारं काहि असं-तसंच असेल
तर सोबतीचा तुमचा आग्रह का आहे..?
दोघांचं मन एकमेकांसाठी
यापुर्वीच आत्महत्या करून मेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...
काय वाटलं असेल कुणास ठावुक
पण मनाच्या मृत्यूनंतरच्या
अंत्यसंस्काराचं काम मात्र
दोघांनीही यथासांग केलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...
ती-तिचा नवरा
तो अन् त्याची बायको
चौघांमध्येही तो मात्र तिची
उगाच अशी छेड़ काढणार,
पण गैरसमज नको हं...
कारण, त्याचं-तिचं आज नाही
ब-याच वर्षांपूर्वी break-up झालंय...
भारत माझा देश आहे
महासत्तेच्या वल्गना करणारा आमचा प्रतिनिधी UN मध्ये मूक होतो आहे
सर्वांच्या प्रचारसभेत नागरिक फक्त घोषणा देतो आहे
मी भगवा, मी हिरवा प्रत्येकजण भांडतो आहे
तरीही देशभर तिरंगा दिमाखात फडकतो आहे
बिहारमध्ये लालू यादव निर्लज्जपणे हसतो आहे
संसदेत प्रश्न विचारायला आमचा नेता पैसे घेतो आहे
तरीही 'भारत माझा देश आहे'चा प्रतिध्वनी ऐकू येतो आहे
भयाण अंधार सर्वत्र, भारतमातेचा जीव गुदमरतो आहे
सीमेवर जवान मूकपणे रक्त सांडतो आहे
त्याच्या शवपेटीकेवरही आमचा मंत्री कमिशन खातो आहे
गांधीटोपी घालून कुणीही स्वस्तात देशभक्त बनतो आहे
महात्म्याचा फोटो मात्र 'भवनात' धूळ खातो आहे
किटकनाशकं सापडली तरी कोका कोला अजून खपतोच आहे
बळीराजा मात्र अन्नपाण्यावाचून तडफडतो आहे
मर्डर, धूम हाऊसफुल्ल, स्वदेस मात्र आपटतो आहे
मंगल पांडेच्या जीवनातही चंगळवाद घुसतो आहे
स्वदेशीच्या घोषणा देणारा मर्सिडीजमधून हिंडतो आहे
आमचा कामगार मात्र फाटक्या संसाराला ठिगळं जोडतो आहे
अंगाला लावायचा साबणही विदेशातून येतो आहे
इथला बेकार युवक दाऊद्च्या टोळीत भरती होतो आहे
खलरक्षणाय सदनिग्रणाय पोलिस मनापासून काम करतो आहे
त्याची टोपी धूळ आणि पट्टा गंज खातो आहे
दयेच्या नावाखाली लाखो बांग्लादेशींना आम्ही पोसतो आहे
म्हणूनच निम्मा भारत आजही दारिद्र्यरेषेखाली जगतो आहे
एकेकाळी सोन्याचा धूर निघणारा हा देश विनाशाच्या दलदलीत बुडतो आहे
सोनं सगळं संपलं, आज फक्त धूर निघतो आहे
कशाचीही लाज राहीली नाही, देवही हताश झाला आहे
कारण आमचा गणपती 'कजरा रे'च्या तालावर नाचतो आहे
स्वप्नं सारी भंगली, स्वातंत्र्यसैनिक अश्रू ढाळतो आहे
आम्ही मात्र GRE,TOEFLच्या dates घेतो आहे
हूंदके देते भारतमाता, आम्हा करंट्यांचा धिक्कार आहे
मोहन भार्गव,माधव आपटे ची सर्वार्थानं आज या देशाला गरज आहे.....
आपोआप
ऋतू बदलतात, चंद्र-सूर्य उगवतात, आपोआप
माणसेही बदलतात, उगवतात मावळतात, आपोआप
तुला सोडून, कधी जाताना दूर, तुजपासून
डोळे पाणावतात, अश्रू दाटतात, आपोआप
हळूच बाहेर, ती डोकावते, खिडकीतून
नजरा मिळतात, बोलत राहतात, आपोआप
नजरेचे तीर तुझिया, घे जरा, आवरुन
खोल शिरतात, घायाळ करतात, आपोआप
कवितेत तुझ्याबद्दल, जातो कधी, लिहुन
चौकशा घडतात, चर्चा होतात, आपोआप
आयुष्याची सापशिडी, नाही खेळायची, अजुन
फ़ासे पडतात, साप-शिड्या गिळ-मिळतात, आपोआप
"वैष्णव जन तो", गेले कुणीसे, सांगून
अर्थ विरतात, तारखा उरतात, आपोआप
संसाराची घडी, गेलीये 'त्याच्या', विस्कटून
येइल तो जगात, कुठल्याशा अवतारात, आपोआप
थवा ....
जिकडे-तिकडे माणसांचा...
मोकाट सुटलेला थवा आहे.
पण मला थव्यातून जायचं नाही,
माझा मार्ग थोडा नवा आहे.
मीही तेच पाहतोय...
पावसाच्या थेंबालाही माहित नव्हतं,
तो कुठे वाहतोय...
सहज विचारलं तर म्हणाला,
"मीही तेच पाहतोय...
अशोका. . .
तो खूपदा निघायचा त्या शितिजाच्या शोधात
मागे सोडून ती लक्तरे आठवणीची. . .
पण भटकायची पावले त्या वैशाख वणव्यात
उरायची मागे फ़क्त जाणीव सावलीची. . .
कोणीच नसायाचे वाटेवर. . . एकटाच तो, एकटीच ती धाव
एकसारखीच गर्दी त्या पडक्या कबरीचीं. . .
का जिंकायचंय त्याला ह्या जगाला हरवून?
भेदरलेली कुजबूज मग त्या मुक्या तलवारींची. . .
रोजचंच युद्ध अन रोजचाच तो आकांत
रोजचीच खळखळ आता फ़ुटक्या बांगड्यांची. . .
नांदायची शांतता त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर
पुसटशी ओळख मग हरवलेल्या श्वासाची
पण. . . . . . . . . . .
एके दिवशी श्वास त्याचाच त्याचाबरोबर रडला
विझवली अश्रुने त्यानं रण्भुमी कलिंगाची. . .
उघडले डोळे. . . तलवार हातुन निसटून पडली
हिच होती सुरुवात त्याच्या सोनेरी विजयाची. . .
अखेरीस जिंकलाच तो. . .जिंकलच त्यानं शितिजाला
उमलली फुल त्याच्या प्रत्येक पावलाशी
आता नव्हता तो एकटा. . .नव्हे एकासाठी त्याची धाव
सापडलेली ओळख एका हरवलेल्या "अस्तित्वाची"
हिरवे पान...
कारणाशिवाय छळणा-या संध्यावेळा
आता मला सकारण छळू लागतील,
पुस्तकात ठेवलेल्या पानावरच्या
हिरव्या खूणा गळू लागतील.
ढळू लागेल मनामधून
आठवांची पाकळी एक एक
आवळू लागेल मानेवरून
बंधनांची साखळी एक एक.
एक एक करून विझतील किंवा
विझवले जातील सारे दिवे
अंगणच माझ्या घराचे लावील
परतवून चांदण्यांचे थवे.
हवे होते ते ते मिळाले
गळाले ते तसे नकोच होते
आंबट-गोडाचा प्रश्न नाही
द्राक्षांना हात लागले होते.
होते ठेवले जपून परंतु
पुस्तकात एक हिरवे पान...
त्या पानाच्या जाळीमधे अता
अडकलो मी कायमचा छान!!
मैत्रीन
एक तरी मैत्रीन अशी हवी,
जरी न बघता पुढे गेलो तरी
मगून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलीच तर अश्रुही पुसणरी
स्वत:च्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळ प्रसन्गी आपल्या वेडया मित्रची
समजूत काढणारी
वाकड पाऊल पडताना मात्र
मुस्काटात मारणारी
यशाच्या शिखरावर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्यानच्या गलक्यात
आपणास सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीन
आपण नसताना व्याकूळ होणारी
खरच! अशी एक तरी जीवा भावाची
'मैत्रीन' हवी आपणास मित्र म्हणवणारी...
मेटामॉर्फॉसिस
जुना फोटो शाळेतला आपला,
बघून लाजरं हसत होतो,
मित्रमैत्रिणी सारखं चिडवतात म्हणून,
बोलायलासुद्धा घाबरत होतो.
कुंचल्यात सदा इंद्रधनु तुझे,
गुणगुणलेल्या गाण्यातून तुलाच फक्त गायचो,
दररोज छातीशी धरून नवी कविता,
शाळेबाहेरच्या बसस्टॉपवर तासन् तास रेंगाळायचो.
शाळेतलं ते फुलपंखी प्रेम(?),
थरथरणाऱ्या हातांनी तुझ्या मनगटावर बांधलं,
एकाच चॉकलेटच्या अर्ध्या-अर्ध्या गोडीसारखं,
"सी प्लस एम्" तळहातावर मेंदीसारखं रंगलं.
साडेतीन वर्षांच्या मोठ्या(?)(!) गॅपनंतर,
आज वागण्याबोलण्यातली मॅच्युरिटी क्षणोक्षण जाणवतेय,
भूतकाळातली ती अल्लड गुलाबी मजा,
आज लाजून लाजून नाही, तर खळखळून हसवतेय.
पहिल्यांदाच तुझ्याबरोबर कॉफी पिताना आज,
काय बोलू नि काय नको असं थोडसं होऊन गेलंय,
बोलते आहेस, हसते आहेस, टाळी देते आहेस तू सुद्धा,
नव्यानं बहरलेल्या मैत्रीनं आपल्या,संकोचाला कधीच पळवून नेलंय.
सोळा ते बावीसच्या या मेटामॉर्फॉसिसची कमाल,
निखळ मैत्रीची अवीट गोडी आज अनुभवतोय,
निरागस तुझं हसणं नि आपल्या गप्पा साठवत साठवत,
समोरची एस्प्रेसो उगाच(?) मिनिटामिनिटाला ढवळतोय.
अशीच तुझ्या हसण्याबोलण्याची पखरण,
गुंफूदे आठवणींच्या माळेत हरेक मोती नवा,
जगण्यासाठी प्रत्येक सेकंदाचा काटा,
अतूट आपल्या मैत्रीचा ताजा श्वास हवा
अजून फक्त एकदाच
लायब्ररीबाहेरचा पिंपळ असाच,
प्रत्येक संध्याकाळी सळसळून हसतो,
पुस्तकांत तुझ्या आठवणींची जपून पिंपळपानं,
जाळीत त्यांच्या स्वतःला मी गुंतवून टाकतो.
भेलकांडलेल्या पुस्तकांच्या गर्दीत,
विचारांची पानं फडफडत असतात,
काना,मात्रा,वेलांट्यांचं राहत नाही बंधन,
भास तुझेच शब्दाशब्दांत गप्पा मारत बसतात.
झिपऱ्या सावरणाऱ्या माडाच्या कुशीत,
तुझ्यामाझ्या हस्तरेषा नकळत मिसळून जातात,
ओल्या वाळूच्या मिठीतून अलगद स्वतःला सोडवत,
लाटाच आपल्या श्वासांची साक्ष बनून राहतात.
प्रत्येक ओळ लिहून संपल्यावर वाटतं,
शब्दसफर मुकी माझी इथेच आता थांबूदे,
मनाजोगती मांडामांड झाली एकदा अवसानाची,
की सगळं सगळं पुन्हा...अजून एकदाच सांगूदे.
किनऱ्यावरच्या त्या स्वप्नांची का परत उजळणी करायची,
छे! आता वास्तवाचा नवा ऋतूही अनुभवायला हवा,
आयुष्याच्या या वळणावर टाकताना पुढली पावलं,
हात तुझा असाच सतत हाती हवा.
नवे ऋतू, नवी स्वप्नं,
नव्याच दुनियेत आता बागडायचंय,
नवे चटके, नवे काटे,
अश्रूंनाही आता एकत्रच लपवायचंय.
सावली तुझीच पुढ्यात,
कायम माझ्या राहूदे,
अजून फक्त एकदाच बहुतेक हेच सांगायचं आहे,
आरशात जेव्हा बघशील,
दिसेल माझीच प्रतिमा,
श्वासाश्वासात तुझ्या आता असं नांदायचं आहे.
कधी कविता करावसं वाटतं
कधी कविता करावसं वाटतं
कधी कधी खुप,
कविता करावसं वाटतं
कुणीतरी म्हणाले....
ते काही इतकं सोपं नसतं.......
कविता करायला आधी
प्रेमात पडावं लागतं
एकदा प्रेमात पडलं की
बरोबर सगळं सुचतं जातं
कुणीतरी म्हणाले...
तेही इतकं सोपं नसतं
प्रेमात पडायला आधी
स्वतःला विसरावं लागतं
स्वतःला विसरुन जाताना
आठवणीचं माहोल जमु लागतं
कुणीतरी म्हणाले..
स्वतःला विसरायला आधी
कुणीतरी आठवावं लागतं
कुणाला तरी आठवायला
थोडस दुर जावं लागतं
कुणीतरी म्हणाले..
दुर जाण्यासाठी आधी
खुप जवळ यावं लागतं
खुप जवळ येण्यासाठी
विश्वासाचा नातं असावं लागतं
कुणीतरी म्हणाले..
विश्वासाचं नातं असण्यासाठी
मनाशी मन जुळावं लागतं
मनाशी मन जुळताना
जुळवुन घेणं शिकावं लागतं
कुणीतरी म्हणाले..
जुळवुन घेणं शिकण्यासाठी
स्वतःला तटस्थपणे पारखावं लागतं
स्वतःला पारखण्यासाठी
कवी व्हावं लागतं
कुणीतरी म्हणाले..
कवी होण्यासाठी आधी
आतुन काव्य स्फुटावं लागतं
आतुन काव्य स्फुटल्यावरच
कविता करावंसं वाटतं
कुणातरी म्हणाले....
तेही इतकं सोपं नसतं
कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे????????????
कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे. अहो, नीट पाहा . जग बायकांचं आहे. स्त्रीप्रधानच संस्कृती आहे आपली...
त्याला वर्गात पोहोचायला उशीर झाला, तर शिव्या पडतात...
तिला उशीर झाला, तर ' हल्ली बसेस लेटच येतायत' म्हणून सरच तिचं स्वागत करतात...
त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर म्हणतात, '' साला लाइन मारतोय बघ!''
ती त्याच्याशी बोलली, तर फक्त विशुद्ध मैत्री...
ती रडली, तर ती म्हणेल ते खरे...
तो रडला तर म्हणतात, पोरींसारखे रडणे शोभत नाही बरे...
मुलीला अपघात झाला, तर ती इतरांची चूक...
मुलाला अपघात झाला, तर ती फक्त त्याचीच चूक...
मुलगा स्त्रियांसाठी राखीव जागेवर बसला, तर तो मॅनरलेस, असंस्कृत...
मुलगी इतर सीट्सवर बसली, तर तिचा तो हक्कच...
तिनं मुलासारखा पोशाख केला, तर तिला आधुनिक म्हणतात...
त्यानं मुलीचा पोशाख केला, तर त्याला... तुम्हाला माहितीये काय म्हणतात...!!
-जग चुकते. त्या चुकीनविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही!
उखाणा............ .
चांदीच्या ताटात ठेवले होते गहू...
लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ..
============ ========= ====
पावाबरोबर खाल्ले अमूल बटर...
***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर
============ ========= ====
एक होती चिऊ एक होती काऊ...
***रावांच नाव घेते , डोक नका खाऊ...
कोल्हापुरी लोकांचा आवडता उखाणा ...
अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस
*** चं नाव घ्यायचा मला नाही आळस
modkya todkya sansarat kela mi parmarth
---- che nav ghete jai jai raghuwir samarth
Vatsavitricha Divas aaj, basle me sajun,
parag che naav ghete, Thodese Laajun..
Sundar Sundar Harnache Wakte Tikde Paay .... Sundar Sundar Harnache Wakte Tikde Paay , ......... Rao Ajun Ghari Aale Nahit, Kuthe Piun Padlet Ki Kaay ?
baba mhantat kokru aai mhnate padas
baki ----- rawanche bhaltech ho dhadas
उगवत्या दिनकरा....
हा उखाणा पु.लं. च्या "असामी... असा मी... " मधीलच आहे.....
handyawar hande saat
tyawar thewli parat
me gote gharat...
ani *****rao padle
sandasachya daraat!!!!
mahalakshmichya dewalat hoto roj kakada...... ......... ....
mahalakshmichya dewalat hoto roj kakada...... ......... ....
Lagnach nahi zal tar nav kunach gheu makada?????? ????????? /
समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता
बेंबट्याचं नाव घेते माझा नंबर पहिला
chandichya tatat jilabiche tukade
....la ghas bharavte
melya thobad kar ikde!
थोडासा घाण आहे,
म्हशिच्या ढुन्गनाला शेणाचा वास...
XXX रावाना भरवते जिलेबीचा घास
bhajit bhaji methichi
timb timb majhya pritichi
कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र
-----नी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र
भारताने आकाशात सोडले मोठ्ठे यान
आणि माझ्या गळ्यात पडले -------
computermadhe aste floppy ani disk,
....shi lagna karun me ghetali mothi risk
तुझ्या प्रेमात
तुझ्या प्रेमात
तुझ्या प्रेमात
मन माझे बेभान हरवून गेले तुझ्या प्रेमात
डुबुन गेले तुझ्या डोळ्यात ग तुझ्या प्रेमात....!!!
रंगात रंगलो चिंब चिंब भिजलो तुझ्या प्रेमात
रोमा रोमत फूललो मी ग तुझ्या प्रेमात...!!!
मनात माझ्या लपलिस तू मी हरवलो तुझ्या प्रेमात
सुगंधी श्वासात श्वास भिडला ग तुझ्या प्रेमात ......!!!
रेशमी केसानी घायाल केलेस वेडा झालो तुझ्या प्रेमात
सुंदर रूपात तुझ्या भुलभुललो मी ग तुझ्या प्रेमात .....!!!
वार्या बरोबर उडुनी गेले माझे मन आकाशाला भिड्ले तुझ्या प्रेमात
तुझ्या रसाळ ओठानी विकेट पाडली माझी ग तुझ्या प्रेमात ....!!!
माझे गांव, माझे जग...!
जातोच आहेस गावाकडे
तर वेशीवरच्या संह्याद्रीला सांग नमस्कार माझा,
म्हणांव, तु ढाल होऊन उभा आहेस तीथे
म्हणूनच लढतोय इथे मावळा तुझा...
वेशीवरनं एस टी आत वळेल,
अलगद, अदखळत माझ्या गावात घुसेल,
माझे गांव, माझे जग
साऱ्या डोळ्यांनी टीपून घे,
कण कण साचवून शीदोरी बांधून घेऊन ये...
जातोच आहेस गावाकडे
तर माझ्या घरीही जाऊन ये,
दारात माज़े मुके जनावर असेल माझी वाट बघत,
थोपट त्याला प्रेमाने अन
येतोय म्हणून सांगून ये..
घरी माझी आई असेल,
तीला म्हणांव काळजी घे..
साचलीच माझी आठवण डोळ्यांत तीच्या,
तर ती माया थेंबभर घेउन ये.
थोरला भाऊही भेटेल माझा,
काही बोलू नकोस, वाकून नमस्कार कर,
त्याच्या पायाखालची चीमुट्भर धूळ घेऊन ये,
येवढं माझं काम कर....
जातोच आहेस गावाकडे
तर लवकरच परतून ये,
दूर इथे मी हळवा व्याकूळ,
गावाकडचे सुख तेवढे घेउन ये.
माझं आपलं असं प्रेम....!!!!
चंद्र सुर्य आणून देईन,
पदरात घालीन लक्ष तारे !
बांधून ठेवीन तुझ्या दारी,
तुझ्या केसांशी खेळते वारे !!!
असं मी मुळीसुद्धा म्हणणार नाही
उगाचं भाव खाण्यासाठी मी खोटं बोलणार नाही...
माझं आपलं सरळसोट सांगण
"माझं तुझ्यावर प्रेम आहे !"
अगदीच 'हीर - रंझा' नसलं तरि
थोडसं सेम आहे !!!
पेट्रोल जाळत फ़िरणं तुझ्यापाठी
मला अजिबात जमणार नाही,
शायनिंगसाठी पैसा उधळणं
मला अजिबात झेपणार नाही.
तरीसुध्दा मार हाक मनापासुन कधी !
उभा असेन तुझ्यासमोर तुझ्यासुद्धा आधी !!!
कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे !
हां ! 'सलमान-ऎश्वर्या' सारखं नाही
माझं आपलं माझ्यासारखं प्रेम आहे !!!!
आणखी एक खरं सांगतो,
तुझं माझ्यावर आणि
माझं तुझ्यावर प्रेम असलं तरी !
'केवळ' सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी
बघत राहीन इतर पोरी !!
पण हे अगदी नक्की त्या कितीही सुंदर असल्या
आणि कितीही मोहक हसल्या तरी,
तुझ्याचं खळीवर पागल होतो,
तुझ्याचं बटांवर पागल आहे आणि
तुझ्याचं डोळ्यात आकाश बघेन !!
अगदी खरं सांगतो
तुझ्यावरच प्रेम होतं,तुझ्यावरच प्रेम आहे,
आणि तुझ्यावरच प्रेम करेन !!!!
एक प्रश्न...?
एक दिवस मी तिज विचारले
माझ्या संगे येशील का?
माझ्या सुंदर स्वप्न नगरीत
भरभरुन साथ देशील का?
एका माझ्या हाकेवर धावत तु येशील का?
वाटले कधी एकटे तर कवेत मज घेशील का?
मोठया तुझ्या या मनात थोडीशी जागा देशील का?
न सांगताच माझ्या भावना तु समजुन घेशील का?
रस्त्यावर चालताना प्रेमळ सावली देशील का?
भरलेल्या मनाचे अश्रु ओंझळीत तु घेशील का?
गेला कधी तोल तर हळुच सहारा देशील का?
लागली कधी भुक तर प्रेमळ घास भरवशील का?
जीवनाच्या अंधारात प्रकाश तु होशील का?
प्रकाशाने त्या जीवन तेजोमय करशील का?
चुकलो कुठे प्रेमाने धपाटा मज देशील का?
सतत येणा-या वाद्ळांना लढायला मला लावशील का?
ह्या प्रश्नाची उत्तरे मज कधी मिळतील का
अनुत्तरीत प्रश्नांची तुच उत्तरं होशील का?
सरते शेवटी एकच वचन मज देशील का?
माझ्या जाण्याच्या घडीला दोन अश्रु ढाळशील का?
कधीतरी अशीच.....!
कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...
कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...
कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...
कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...
कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...
ज्या ज्या वयात जे जे करायचं .. !!!!
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !
लहानपणी ... फुलपाखरांच्या मागं धावायचं
तरुण वयात 'पाखरांच्या' मागं धावायचं
प्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं
म्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !
लहानपणी ऊन वारा पावसामधे मनमुराद बागडायचं
तरुणपणी प्रत्येक श्वासात मोगरा घेऊन जगायचं
प्रौढ वयात आपल्या भोवती नंदनवन फुलवायचं
म्हातारपणी त्याच बागेत निव्रुत्त मनानं रमायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !
लहानपणी खेळातलं भांडण जिथल्या तिथं मिटवायचं
तरुणपणी मोर्चे न्यायचे, आंदोलनसुद्धा करायचं
प्रौढ झाल्यावर आपल्या सगळ्या तक्रारींची मुळं शोधत रहायचं
उतारवयात सार्या मुळांना गीतेत बुडवून टाकायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !
तरीही काही गोष्टी प्रत्येक वयात जमायला हव्यात
पहिल्या पावसाच्या पहिल्या धारा अंगावरती झेलायला हव्यात
वार्यासोबत पिसासारखं हलकं होता यायला हवं
गडगडणार्या मेघासारखं बोलकं होता व्हायला हवं
अंधाराच्या गर्भामध्ये ज्योत ठेवता यायला हवी
एकटं खूप वाटतं तेंव्हा गाणी म्हणता यायला हवी
कुठ्ल्याही वयात आपला आनंद आपणच शोधत रहायचं...
तरीही...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !
जरा इकडे ध्यान द्या
मढे प्रत्य़क्श चालवी । तया ऐकवी बोलवी
पाणी पेववी मढीया । अन्न जेववी हे काया
नाना दाखवी कौतुक । देव नित्य जवळीक
सर्व देहीचे व्यापार । चालवीतो नीरंतर
तुकाविप्र म्हणे देही । गुरुक्रिपे देव पाही
नींदा ऐसे पाप नाही त्रीभूवनी | नींदा म्हणवोनी करु नये
माता पीतराची गुरु भ्रताराची | संत सज्जनाची नींदा खोटी
सर्व शहाणीया सूचना एकदा | न करावी नींदा कोणाचीही
तूकावीप्र म्हणे नींदावे आपणा | वंदावे चेरणा सर्वत्राचे
नेहमी तिचाच विचार, नेहमी तिचीच आठवण
का एका मैत्रिणी साठी मी इतके झुरतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
चार चौघात मित्र मला तिच्या नावाने चिडवतो ...
का त्याचा प्रयत्न फसतो कारण खरतर मनात मी हसतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
'परदेशी चाललास पण मला विसरु नको'
का तो तिचा शेवटचा SMS मी परत परत वाचतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
तू परत कधी येणार? ती रोज रोज विचारते :(
का 'नक्की नाही' म्हणताना माझा आवाज खालावतो...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
तिला एक स्थळ आले, कोणी तिला पाहून गेला
का तिने त्याचे नाव घेता मी विषय बदलतो
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

