Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

सोमवार, २७ एप्रिल, २००९

चारोळी

Share

अग ,आन्धल ,पांगल,काही नसत ग,
बुद्धि वर आलेली झापड़ असतात.
भल्या -भल्यांची,प्रेमात झालेली माकड असतात.

******************************

प्रेमाबद्दल बोलायचं म्हणजे
शब्द ही पडती अपुरे
दोन मने जुळायला
प्रेमाची एकच जाणीव पुरे

******************************

प्रेम कुठे ही जात नाही,
ते हृदयात कायम असत.
मनालाच वाटत उगाच ,
ते प्रेम कधी कमी आहे, कधी जास्त !!

******************************

खरे प्रेम कधीच मनातून काढून टाकता येत नाही,
पण का? प्रेम केलेल्या व्यकती ला ही थांबवता येत नाही,
खरे प्रेम करताना ते कधीच मोजून-मापून होत नाही
तरी का मनाला ते वाटते,प्रेम.. कधी कमी, कधी जास्त.....!!

******************************

मन न ,खुप चंचल असत,
दिसली हिरवल, की घुसनार्या वासरासारख ,
बांध घातला तरी, वाट फुटेल तिथे
वाहात राहणार्या पान्यासार्ख....
म्हणुनच त्याला प्रेमाची
जास्त कमी महसूस होते,
प्रेम अविचल असत हृदयात, तरी
मन उगाचच कासाविस होते.........

******************************

मन कासविस होते......
जेव्हा वार्‍या सारखे वाहूनही हिरवळ मिळत नाही..!!
मन कासविस होते.......
जेव्हा पाण्यासारखे वाहूनही किनारा मिळत नाही...!!
मन कासविस होते......
जेव्हा मनाला चाहूल लागते ह्दय तडकण्याची.....!!

******************************

मनातच असू दे रे मनाची हालत
दुनियेसमोर सांगू नका
सर्वांसमोर सांगून त्याला
चार चौघात लाजवू नका

******************************

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top