त्याला चांगलं माहित असतं
ज्याला आरंभ असतो
त्याला अंतही असतो
म्हणून अंताचा विचार केल्याशिवाय
तो कशाला आरंभ करत नाही
काही नीट संपवता येत नसेल तर
तो सुरू करत नाही
ज्या ठिकणी जायचं असतं
त्याचा रस्ता सोडत नाही
आणि जिथे जायचं नसतं
तिकडचा पत्ता विचारत नाही
तो ध्येय किंवा लढाई निवडताना
अंताचा विचार करतो
"मी कशासाठी, कोणासाठी लढतोय?
मी कुठे जातोय, काय करतोय?
हे सगळं मला पटतय का?"
या प्रश्नांना उत्तरं मिळाली नाहीत
तर तो पुढे जात नाही
पण एकदा लढायचं ठरवलं की
माघार पत्करणार नाही
पराजय चालणार नाही
मरण आवडेल पण
अपमान खपणार नाही
जे सुरू केलय त्याचा
अंत नीट झालाच पाहिजे
वाईट माणसं जिंकली तरी चालेल पण
चांगला माणूस हरला नाही पाहिजे
बुधवार, २९ एप्रिल, २००९
आरंभ - अंत
२:१८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा