चंदनाचा धर्मं झिजन्याचा
मी कधी नाही नाकारला
गुलाब सुद्धा मी नेहमी
काट्यांसाहित स्वीकारला
******************************
चंदनाने झिजावे ,
गुलाबाने रिझावे ,
हे त्यांचे कामच आहे,
काट्यावर चालून न विव्हलता,
पुढे जाणे,हा मानवाचा धर्म आहे.
******************************
निघून जाइल पायात रुतलेला काटा
जखम ही भरून जाईल
पण मनाचं जर रुतला काटा
तर मी मरून जाईल
******************************
मरनाच काय घेउन बसलास,
लोक रोज थोड थोड मरतच असतात .
आयुष्य दिले देवाने जगण्यासाठी ,
पण मरणाच्या आशन्केन डरतच असतात !
******************************
पायातल्या काट्याने
फ़क्त पाय दुखावतो
मनातल्या काट्याने
पूर्ण माणूस विव्हळतो
******************************
आयुष्य जर देव
देतो जगण्यासाठी
तर का ह्रदय तडपडत
तिच्या जाण्यानी
******************************
रोजच्या मरन्यापेक्षा
एकदा मेलेलं बरं
आयुष्यातून उठण्या अगोदर
आयुष्यातून गेलेलं बरं
******************************
प्रेम करणार तू
अन त्रास मनाला
दगा देणार ती
अन दोष देवाला
******************************
ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,
फुटले तर नाही ?
आयुष्याचे रंग ,
विटले तर नाही ?
शनिवार, २५ एप्रिल, २००९
चारोळी
९:४५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , चारोळी , मराठी कविता , मराठी चारोळी , मराठी चारोळ्या , charoli , marathi charolya , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , चारोळी , मराठी कविता , मराठी चारोळी , मराठी चारोळ्या , charoli , marathi charolya , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा