Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

एक विरह कवी..........

Share

अजुनही आठवतय मला ते सर्व काही
ती शेवटची एक काळी कुट्ट संध्याकाळ
सोडून जात होतीस मला तू खुप दूर दूर
जीवनाच्या प्रवासात येणाऱ्या त्या काळ्याभोर अंधारात
शेवटी माझ्या शरीराचाच एक भाग निसटुन दूर जात होता
पण जाता जाता खुप काही नेलेस तू...
माझे मन, ह्रदय, विश्वास, धीर सर्व काही
तुटत होतो मी प्रत्तेक सेकंदाला
सेकंदाच्या प्रत्तेक क्षणाला
येशील जेव्हा चुकून कधी पुन्हा याच गावी
तेव्हा त्या वाटेवरून नक्कीच जा
आठवेल पुन्हा तुला सर्व काही
तिच काळी कुट्ट संध्याकाळ
तेच मला सोडून जतानाचे क्षण
पण मी तसा नाही
असेन मी तिथेच कुठेतरी झाडाखाली
पण त्या वेळेला मी एकटा नसेन
कारण माझ्या हातात लेखणी आणि कागद असेल
तुझी वाट पाहता पाहता एक कवी झालेलो असेन
एक विरह कवी..........

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top