ोणत्या अर्थास ही छळतात गाणी
कोणत्या शब्दांसवे पळतात गाणी
तु सखे गेलीस ज्या रचुनी चितेला
त्याच आगीशी आता जळतात गाणी
मजला नको ती दाद गावाशी तुझ्या
बहिऱ्यांसही माझी .... कळतात गाणी
आसवांचे आज मजला न्युन नाही
पापण्यांशी सारखी गळतात गाणी
पौर्णिमेचे वेश तु लेउन सजता
चांदण्यांशी आजही मळतात गाणी
दुःख जे असते उराशी पीत जाणे
दुःखासवे अश्रुही गिळतात गाणी ..




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा