Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, २१ जुलै, २०११

तुझ्याशिवाय

Share

तुझ्याशिवाय

आभाळ जेव्हा भरून येत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ......
तुझ्या आठवणींची

पान पान शहारून येत
तेव्हा दवबिंदूने लाजायचं नसत
मरण कुशीत येईल आता
म्हणून पानाने ओसरायच नसत
तेव्हा पहायची फक्त वाट
आसवाने डोळ्यांची आणि
अर्ध्या जागलेल्या स्वप्नाने
तुझ्या आभासांची

होईल वाऱ्याची ओळख
तेव्हा फुलाने दरवळायच असत
अस असत दुख म्हणून
गंधाने वेदनेला टिपायच नसत
तेव्हा मात्र कराययचाच फक्त घात
विव्हळणार्या चांदण्यांनी
क्षय झालेल्या पौर्णिमेचा आणि
अस्तीवाहीन वाऱ्याच्या ओळखीने
तुझ्या जाणीवेचा

पसरतील हात अंगणाचे जेव्हा
तेव्हा करायची अंधाराची मुठ
काळोखाला नसतेच जाग
उजेडातल्या सावल्यांची म्हणून
क्षीतीजाने काजळायाच नसत
त्याने जाळायची वात
सूर्याच्या विभोर स्पर्शाची आणि
काळ्याभोर शाईने तुझ्या कवितांची
बस्स इतकंच मग झाल
आणखीन काय ???
तुझ्याशिवाय इतक बास आहे मला


.....कविता

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top