निरोपकाळाच्या या नाजुक गाठी दातांनीही सुटतिल ना हळूच उमलती पंख हे कोमल दो हातांनि मिटतिल ना ॥ काळ बसला मारित गाठी मिटुनि डोळे लावुनि मन वैशाख वणवा अलगद पेटे कातरस्मृतींचे जळते वन ॥ कालाचे हे चाक दातेरी ना कधीही मागे फिरे कोण चिरडते पदी तयाच्या कोण उरे आणि कोण मरे ॥ प्रसन्नतेचा झरा खळाळे ओसंडुनि हे गात्र न् गात्र निरोप देतो तुजला आता भरूनि गेले घटिका पात्र ॥ |
शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०
निरोप
६:०६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा