विचारांच्या बाणांवर शरपंजरी मी पडलो…
त्या बाणांच्या टोकावरले विष पचवत चाललो |
एवढ्या विचारांतच मीच मला विसरत चाललो ..
ह्या विचारांच्या चक्रव्यूहात अभिमन्यूच झालो |
बाहेर निघायचा प्रयत्न करताच , जास्त वार झेलू लागलो |
विचारांनी रक्ताबंबाळ झालो, अन् मीच मला विसरत चाललो .. ||
विचारांच्या तळपत्या उन्हात, चटके खात चाललो…
सावली शांत मनाची, चारी दिशा शोधत चाललो |
पण ती न सापडता , भोवळ येवून पडलो…
आणि माझ्यातला मीच हरवत चाललो |
माझ्याकडे मी दुस्रयांच्या नजरेतून बघत चाललो..
माझ्यातला मीच शोधत चाललो ……
विचारांच्या झंझावातात मी गुरफटत चाललो …
आणि माझ्यातला मीच हरवत चाललो |
या चंचल मनाचे निर्णय साधत चाललो
दर वेळी चुकली वाट तरी पुढे सरतच चाललो ….
माझ्या जगण्यावर मीच रडत चाललो .. हसत चाललो …
आणि माझ्यातला मीच हरत चाललो |
रात्री अंधारात स्वप्न बघत चाललो ..
स्वप्नांच्या गुंत्यात मी गुंतत चाललो ||
माझ्याकडून मी जास्त अपेक्षा ठेवू लागलो ..
अपेक्ष्यांच्या ओझ्याखाली मी दबत चाललो …
ह्या (स्व) अपेक्षा कधी पूर्ण करू शकेन का?
गुरुवार, ४ जून, २००९
***विचारांची भटकंती***
५:५०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा