रक्त ओकून शांत होणे, हेच उरले काम आहे
कावळ्यांचे शाप घेऊन, वासरू बदनाम आहे
ह्या स्मशाणातून आता, आरत्या होतात नित्ये
हेच मंदीर जाहलेले, हेच चारी धाम आहे
का सबब देऊन हल्ली सांत्वने होतात येथे
रावणांचे वेश सगळे, शुन्य झाला "राम" आहे
तोकड्या कपड्यांस आता वेशभुषा मानती ते
झाकत्या अंगास आता, चार आणे दाम आहे
मोजतांना चिंधड्या आणि मनाची लक्तरे ही
कोणता आराम आणि कोणते विश्राम आहे ?
हाय रे तुही कधीचा हारलासी रे महात्म्या
जिंकला लादेन आणि, जिंकतो सद्दाम आहे ..




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा