उमललेल्या कळ्या आता
मिटायला लागल्या आहेत
भावनांचे बांध आता
तुटायला लागले आहेत
भरून आलय आभाळ
काळजातल्या भिती संगे
हृदयाची वाढलीय धड्धड
श्वासांच्या घरघरी संगे
दूर क्षितीजा पर्यंत नजरा
कुणाचा तरी ठाव घेताहेत
माझे श्वास उच्छ्वासही
आता तुझेच नाव घेताहेत
वाटतं पळत सुटावं
त्या क्षितीजापलिकडे तू उभी असशील
ती वेड्या मनाची आशा आहे
क्षितीजं का कधी संपतील ?
मन आणि हृदय लागलेत
मेंदूशी भांडायला
आणि मी पळत सुटलोय
ती क्षितीजं ओलांडायला. . .
गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०
क्षितीज. . .
२:२८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा