प्रेम हे काय असतं, मनामनातलं अम्ऱूत असतं.
सख्या जेव्हा भेटलीस तू, तेव्हाच ते पटलं होतं
आनंदून गेलं मन माझं प्रेम जेव्हा तुझं भेटलं,
खरं प्रेम असतं जगी वाक्य हे खरं पटलं.
दिवसरात्र प्रेमात वेड्या मन हे वेडं रमत होतं,
जणू विश्र्वात माझ्या भल्यामोठ्या तुझ्याविना कोणीच नव्हतं.
विश्वास जागवलास मनी माझ्या, म्हणून मन हे तयार झालं.
कळत नाही पण मला, नंतर तुला काय झालं.
प्रेम तुझे आकाशाएवढे असं सारखं जाणवत होतं,
मग धावपळीच्या या जीवनात तुला बोलणही कसं शक्य नव्हतं.
सगळ्यांची या सबब ऐकता मनाला सतत वाटत होतं,
मनात प्रेम असताना एवढं कुणी असं कसं वागू शकतं.
दिवसेंदिवस लोटत होते सहन हे सारं होत नव्हतं,
काय करु न् कसं करू हेच मुळी कळत नव्हतं.
कळत होतं सगळं मला पण काय करु वळत नव्हतं
वळवून घ्यायला हे सारं मन हे वेडं तयारच नव्हतं.
किती समजावलं खुळ्या मनाला तरी ते शक्य नव्हतं, कठीण आहे रे बाळा मानायला
.
.
.
.
.
प्रेम तुझं केव्हाच नव्हतं.
सोमवार, १४ सप्टेंबर, २००९
प्रेम तुझं केव्हाच नव्हतं.
५:२८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा