कविता करायला कधीही
गरज नसते " कवी" मनाची
प्रत्येकाच्या सुप्त मनात सर्व काही असते ...
गरज असते ती लेखणी आणि पानाची........
*************************************************
तुझी आठवण आल्यावर अश्रू जड होतात
कदाचित वाहून नेतात तुझ्या आठवणींच ओझ
मग वाहून सुद्धा तुझ्या आठवणी
मनात तशाच का राहतात ??
*************************************************
वसंतातल्या बहराप्रमाणे
तुझी माझी प्रीत फुलावी
त्याला गंध विश्वासाचा
अन मधाला नात्याची गोडी असावी....
*************************************************
या वेड्या राधेचा कृष्ण बनशील का रे ??
"नाही" असेल ना उत्तर!!!!!!!
राधा - कृष्णाच्या मिलनामध्ये तेवाही होते अडथळे खूप सारे
हट्ट नाही करणार राधा बनण्याचा...
पण निदान तुझी मीरा तरी बनवशील का रे ??
************************************************************
बुधवार, २३ सप्टेंबर, २००९
मराठी चारोळ्या,
१०:५६:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , चारोळी , मराठी कविता , मराठी चारोळ्या , charoli , marathi charolya , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , चारोळी , मराठी कविता , मराठी चारोळ्या , charoli , marathi charolya , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा