?ओळखलत का सर मला?? - पावसात आला कोणी..,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी....
क्षणभर बसला, नंतर हसला... बोलला वरती पाहून
?गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन?...
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी ? बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले...,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
?पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा?!
- कुसुमाग्रज
सोमवार, ७ सप्टेंबर, २००९
कणा
४:०३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , बालभारती - आठवणीतील कविता , मराठी , मराठी कविता , Balbharati , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , बालभारती - आठवणीतील कविता , मराठी , मराठी कविता , Balbharati , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा